शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 4:09 PM

भाजपची अवस्था ‘धोबी का..’

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असताना आदल्या दिवशीच महायुतीला धक्क्यांवर धक्के बसले आहेत. यातून महायुती कशी सावरणार आणि त्यासाठीचा ‘बी’ प्लॅन काय करणार याकडेच आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी पहिला बॉम्ब टाकून करवीर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरोधात संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली. आणखी एक घटक पक्ष असलेल्या ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी चिरंजीव राहुल आवाडे यांची अपक्ष उमेदवारी जाहीर करून दुसरा दणका दिला. याचदरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन ‘तुतारी’ घेण्याची तयारी केली असून, ते आता थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत.याचदरम्यान भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, दुसरीकडे अजित पवार गटाचे खंदे पदाधिकारी ए. वाय. पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदासह, सदस्यपदाचाही राजीनामा बुधवारी दिला. इचलकरंजी, करवीर, राधानगरी आणि कागल अशा चार विधानसभा मतदारसंघांत महायुतीला हे धक्के बसले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नसतानाही राजकीय हालचाली वेगावल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यात नेत्रदीपक कामगिरी केली आहे त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधकांनी जोडण्या घालायला सुरुवात केली आहे. या राजीनामासत्रामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके या महायुतीच्या उमेदवारांसमोरील अडचणी वाढू शकतात.आवाडे यांनी सुरुवातीला निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता; परंतु आता ते अपक्ष लढणार असल्याचे सांगत असून त्यांच्याबाबतीत भाजप काय निर्णय घेणार किंवा विनय कोरे यांना कशा पद्धतीने थांबवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आवाडे यांना भाजप अजून आतच घ्यायला तयार नाही. इचलकरंजीचा भाजप हा आवाडे यांच्यामुळे नव्हे, तर मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमुळेच असल्याची स्थानिकांची भावना आहे.

फडणवीस यांचा महाडिक यांना फोनसमरजित घाटगे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार धनंजय महाडिक यांना बुधवारी फोन केला. त्यानुसार त्यांनी दिलेला निरोप आपण घाटगे यांना देण्यासाठी भेटणार आहोत, अशी माहिती महाडिक यांनीच पत्रकारांना दिली. नाथाजी पाटील यांच्या नियुक्तीनंतर राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे; परंतु त्यांना नवी जबाबदारी देण्यात येणार असून ते आज महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहतील असा दावाही महाडिक यांनी केला आहे.

भाजपची अवस्था ‘धोबी का..’कोल्हापूर जिल्हा भाजपची अवस्था ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ अशी आज झाली असल्याची टीका ‘उबाठा’चे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी पत्रकात केली आहे. त्यात ते म्हणतात, सत्तेचे आमिष दाखवून जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतील नेत्यांना पक्षात घेतले. व मूळ भाजपच्या लोकांना घरी बसवले. आज हेच बाहेरून आलेले नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. कारण ज्या उद्देशाने पक्षात आले होते तो उद्देश सफल होत नाही, हे लक्षात आल्यावर ते अन्य पक्षांत जात आहेत.

ज्या मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचे म्हणून ओळखले जाते, त्यांना कोल्हापूर जिल्हा खऱ्या अर्थाने कधी कळलाच नाही, हे भाजपचे दुर्दैव आहे. आता मात्र निष्ठावंतांची आठवण भाजप नेतृत्वाला होत आहे, म्हणूनच नाथा पाटीलसारख्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष केले जाते. स्वत:चा स्वार्थ साधणारे अनेकजण काही दिवसांत भाजप सोडून गेले तर आश्चर्य वाटायला नको.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस