शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार

By समीर देशपांडे | Published: April 21, 2023 12:32 PM

१९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही

समीर देशपांडेकोल्हापूर : एखादा प्रश्न भिजत कसा ठेवावा आणि दरवर्षी त्याबाबत नवनवीन घोषणा कशा कराव्यात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न. कारण १९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही. असा एक-एक प्रश्न संपायला एक पिढी जाणार असेल तर हा विकास नेमका कोणत्या दिशेने चालला आहे हा खरा प्रश्न आहे.सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या जिल्ह्यातील कुंभी, कासारी, तुळशी, धामणी आणि भाेगावती या पंचगंगेच्या उपनद्या आहेत. या पाच नद्यांच्या प्रवाहातून करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे संगम होतो आणि पंचगंगा नदीची निर्मिती होते. येथून ८१ किलोमीटरवर नृसिंहवाडी येथे पंचगंगा नदी कृष्णा नदीला मिळते. या दरम्यान उभारण्यात आलेले विविध उद्योग, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका, ८८ ग्रामपंचायती या कमी अधिक प्रमाणात या पंचगंगा प्रदूषणाला कारणीभूत आहेत.नेते अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच कारणीभूत१९८९ मध्ये पंचगंगेच्या पाण्याबाबत विचारणा होऊ लागली तरी त्यावेळी इतके औद्योगिकीकरण वाढले नव्हते. पण नंतर लोकसंख्या वाढतच राहिली. औद्योगिकीकरण झाले. शहरांमध्ये लोकसंख्या केंद्रित होऊ लागली. अनेक पाणी योजनांच्या माध्यमातून माणसी रोज ४० लीटर पाणीपुरवठा होऊ लागला. साखर कारखान्यांचे डिस्टिलरी प्रकल्प उभे राहिले. एकीकडे हा सगळा विकास वेगाने होत असताना दुसरीकडे यातून निर्माण होणारे सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक होते. परंतु, तत्कालीन नेते आणि अधिकारी यांनी हा प्रश्न कधीच गांभीर्याने घेतला नाही आणि आता मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदने द्यायला सर्वपक्षीय झुंबड उडालेली पाहावयास मिळते.उपाययोजनांचे आदेश कागदावरच२०१२ मध्ये इचलकरंजीत काविळीच्या साथीमध्ये ८५ नागरिकांचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने यासाठी समिती नेमली आणि नियमित आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा प्रदूषणाच्या नियमित बैठका होतात. परंतु, प्रश्न अजूनही सुटत नाही. अजूनही दरवर्षी पाणी काळे होते, मग दुर्गंधी सुटते, मासे मरतात, बातम्या येतात, मग नेतेही येतात. भाषणे ठोकतात. पंचगंगा तशीच वाहते आहे. काही ठिकाणी जलपर्णीच्या उदराखालून काही ठिकाणी काळीकुट्ट होऊन.

हे आहेत सांडपाण्यासाठी जबाबदार

  • अ. न. जबाबदार घटक विनाप्रक्रिया नदीत मिसळणारे पाणी प्रतिदिन द.ल.लि.
  • कोल्हापूर महापालिका  -   ०६
  • इचलकरंजी महापालिका   -   २०
  • ग्रामपंचायती ८८   -  ७१.३३

मैला जात नसल्याचा दावाकोल्हापूर शहराला रोज १३० द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो. यातून १०४ द.ल.लि. सांडपाण्याची निर्मिती होते. यातील ९९ द.ल.लि.वर प्रक्रिया केली जाते. तर ६ द.ल.लि. सांडपाणी पाच नाल्यांतून पंचगंगा नदीत मिसळते. परंतु, या सांडपाण्यातून नदीत मैला मिसळत नसल्याचा दावा कोल्हापूर महापालिका करते तो किती खरा आणि खोटा हा संशोधनाचा विषय आहे.

बैठकांवर बैठकाउच्च न्यायालयाने सांगितले आहे म्हणून विभागीय आयुक्त कोल्हापूरमध्ये येतात. बैठका घेतात. महापालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. मागचा आढावा घेतला जातो. उरलेले काम किती दिवसात करणार असे विचारले जाते आणि बैठक संपून जाते. या गतीने पंचगंगा नदीचे प्रदूषण संपवताना नव्याने काही प्रश्न निर्माण हाेणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण