शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Kolhapur: पाऊस काही थांबेना.. शेतीचे पंचनामे होईना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 4:59 PM

पाणी वाढले फुटांनी.. कमी होतेय इंचाने 

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेले महापुराचे पाणी चार दिवसात फुटा फुटांनी वाढले पण ते कमी होत आहे इंचा इंचाने, त्या गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा धोधो कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा धडकी भरली आहे. या पूर, पावसाच्या खेळात पंचनाम्यांचा मात्र खेळखंडोबा होत आहे.आठवड्यापूर्वी पर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट होता. त्यानंतर गेल्या आठ दिवसात पुराचे पाणी फक्त ५ फुटांनी कमी झाले आहे. कोल्हापूर शहरातील व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, कुंभार गल्ली, नागाळा पार्क सारख्या भागांतून पुराचे पाणी ओसरले आहे पण, अजूनही पंचगंगा हॉस्पिटल, शिवाजी पूल, त्यापुढे चिखली, आंबेवाडी सारख्या गावांतील पाणी पूर्णत : ओसरलेले नाही. काही घरांमध्येही अजून पाणी आहे. त्यामुळे या मिळकतींचे पंचनामे करता येईनात.

या आहेत अडचणी

  • काही घरांमध्ये अजून पाणी आहे, शेतीतील पाणी तर ओसरायचे नावच घेत नाही त्यामुळे पंचनामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जाता येईना.
  • घरमालक आणि भाडेकरूंचा वाद. भाडेकरूंनी घरमालकासोबत करारनामा केला असेल तर नुकसानीची रक्कम भाडेकरूला देता येते. पण तसे नसेल, तर घरमालकाला रक्कम दिली जाते.
  • एकाच कुटुंबात पण चारही भाऊ वेगवेगळे राहत आहेत. ते एकाच मिळकतीचा घरफाळा भरत असतील, घर एकाच्याच नावे असेल तर रक्कम नेमकी कुणाच्या खात्यावर पाठवायची.

धोरणाची प्रतीक्षानुकसान भरपाईच्या रकमेबाबत शासनाकडून अधिसूचना काढली जाते. २०२३ मध्ये काढलेल्या अधिसूचनेत घरात २ दिवसांहून अधिक काळ पुराचे पाणी राहिले तर १० हजार रुपये देण्याची तरतूद होती. शिवाय दुकाने व टपरी मालकांनाही यात धरले होते पण यावर्षी नेमके काय करायचे आहे याची अधिसूचना शासनाने काढलेली नाही. सध्या तरी प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या मिळकतींचे पंचनामे केले जात आहेत.

काही घरे व शेतीतील पाणी ओसरलेले नसल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. पण जिथे पंचनामे सुरू आहेत. तिथे नागरिकांकडून खूप चांगले सहकार्य मिळत आहे. कुठेही तक्रारी झालेल्या नाहीत. - हरिश धार्मिक, प्रांताधिकारी, करवीर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरAgriculture Sectorशेती क्षेत्र