शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

'धर्मादाय'च्या सर्व्हर डाऊनने मनस्ताप, दोन महिन्यांपासून कामकाज ठप्प; राज्यभरातील स्थिती 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 29, 2024 17:23 IST

लोकांचे विविध कामांसाठी हेलपाटे

इंदुमती गणेशकोल्हापूर : राज्यभरातील धर्मादाय उपायुक्त कार्यालयातील सर्व्हर डाऊन झाल्याने गेल्या महिन्याभरापासून न्यासांची नोंदणी, हिशोबपत्रकांचे कामकाज ठप्प झाले आहे. या अडचणीमुळे पक्षकार, वकील व न्यासांच्या नोंदणीसह विविध कामकाजांसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप होत आहे. कोल्हापुरातील एका कार्यालयात महिन्याला किमान ४० ते ५० न्यासांची नोंदणी होते व शेकडोवर हिशेबपत्रके सादर होतात. असा महिनाभर सर्व्हर डाऊन असूनही तो कशामुळे डाऊन झाला याचे कोडे उलगडलेले नाही. तांत्रिक अडचण असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. लोक एकदम हिशोबपत्रके सादर करत असल्यानेही ही समस्या उद्भवली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.लोकहितासाठी काम करत असलेल्या, सभासद असलेल्या सार्वजनिक संस्था, संघटना, मंडळे यांचे कामकाज धर्मादाय कार्यालयांतर्गत येते. अशा सर्व संस्थांची नोंदणी करणे, त्यांचे वर्षाला नुतनीकरण करणे, दरवर्षी लेखापरीक्षण सादर करणे, हिशेबपत्रके सादर करणे ही सर्व कामे धर्मादाय कार्यालयांतर्गत केली जातात. मात्र दिवाळीपासून या कार्यालयाच्या सर्व्हरमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे.सकाळी ९-१० वाजता कामकाज सुरू झाले की सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम सुरू होतो तो दिवसभर असाच असतो. सायंकाळी ५ नंतर सर्व्हर जरा वेग पकडतो, तोपर्यंत कार्यालयाची वेळ संपते. हे असे गेले महिनाभर म्हणजे दिवाळीपासून सुरू आहे. सार्वजनिक संस्थांच्या वेगवेगळ्या कामासाठी अनेक पक्षकार, वकील, नागरिक कार्यालयात येतात. अनेकजण परगावहून आलेले असतात. मात्र इथे आल्यावर त्यांना हेलपाटे मारावे लागतात.

मुंबई कार्यालयाकडे रोज पाठपुरावायाबाबत धर्मादाय उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व्हर डाऊनची वस्तुस्थिती मान्य केली. हे कार्यालय शासनाधिस्त असल्याने हा प्रश्न मंत्रालयातूनच सोडवला जाणे अपेक्षित आहे. याबाबत रोज मुंबईत पाठपुरावा सुरू आहे. पण अजून त्याला यश आलेले नाही पुढील आठवड्यापासून कदाचित यंत्रणा सुरळीत होऊ शकेल, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

हिशोबपत्रकांसाठी दिली मुदतवाढसार्वजनिक संस्थांचे आर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपते, त्यानंतर पुढील सहा महिन्यात त्यांनी हिशोबपत्रके सादर करणे व त्याचे प्रमाणपत्र धर्मादाय कार्यालयाकडून घेणे बंधनकारक असते. मात्र सर्व्हर डाऊनमुळे हे काम थांबले आहे. अखेर कार्यालयाने त्यासाठी संस्थांना डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

न्यायालयीन कामावरही परिणामधर्मादाय कार्यालयांतर्गत अनेक संस्थांचे न्यायालयीन खटले चालतात. कोल्हापुरातील धर्मादाय उपायुक्त कार्यालयात तीन कोर्ट आहे. त्यापैकी सध्या दाेन रिक्त आहेत. त्यामुळे एका कोर्टावर ताण येत आहे, त्यात सर्व्हर डाऊनमुळे न्यायालयीन कामावरही परिणाम झाला आहे.

आमच्या समाजाचे रुकडी येथे विश्वकर्मा महिला संस्थेच्या नोंदणीसाठी दोन महिन्यांपूर्वी सर्व कागदपत्रे धर्मादाय कार्यालयाकडे दिली होती. वारंवार पाठपुरावा करूनही संस्थेची नोंदणी का होत नाही याची विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांनी सर्व्हरची अडचण असल्याने नोंदणी करता येत नसल्याचे दाखविले. चंद्रकांत कांडेकरी, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज

टॅग्स :kolhapurकोल्हापूर