शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कोल्हापूर: फराळे कारखान्याचा हंगाम बंद झाल्याने तीनशे तरुण बेरोजगार, शेतकऱ्यांनाही बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:10 PM

रायगडचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी फराळ्याच्या फोंड्या माळावर रिलायब शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आणी तालुक्याला हरित क्रांतीला चालना मिळाली.

सुनिल चौगलेआमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यातील फराळे येथील रिलायबल शुगर कारखान्याचा यंदाचा हंगाम बंद झाल्याने तीनशे तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील जवळपास दीड लाख टन ऊस इतर कारखान्यात पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक होणार असून वाहनधारकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कामगार, शेतकरी व वाहनधारक हतबल झाले आहेत.राधानगरी मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या अनास्थामुळे तालुक्यात साखर कारखानाच काय तर कोणताही औद्योगिक प्रकल्प उभारला गेला नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पहायला मिळत आहे. त्यामुळे रोजगारासाठी तरुणाचे जथ्थेच्या जथ्थे कागल व शिरोली एमआयडिसीकडे जातात. रायगडचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी फराळ्याच्या फोंड्या माळावर रिलायब शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आणी तालुक्याला हरित क्रांतीला चालना मिळाली.प्रतिदिन दोन ते अडीच हजार क्रशिंग कपँशिटी असणारा कारखाना प्रत्येक हंगामात दीड दोन लाख गाळप करत होता. आतापर्यंत आठ गळीत हंगाम पुर्ण झाले. यावर्षीचा हंगाम सुरु होण्याची तयारी सुरु असतानाच कारखाना प्रशासनाने अचानक हंगामच बंद केल्याने तीनशे कामगांराच्या नोकरीवरच गंडातर येण्याची भिती आहे. तर तालुक्यातील दीड लाख टन ऊस इतर कारखान्याना परत पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक होणार आहे. तसेच अनेक वाहन धारकानाही याचा मोठा फटका बसणार आहे.प्रशासनाने त्वरित लक्ष द्याव३०० कामगार तसेच शेतकरी व वाहनधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने याची दखल घेऊन प्रशासनाने कारखाना सुरु होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

आर्थिक अडचण आल्याने हंगाम वेळेत सुरु झालेला नाही हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे - तुषार राणे - कार्यकारी संचालक, साखर कारखाना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने