शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' नद्यांमधील गाळ काढणार, पण टाकणार कुठे ?; जिल्हा प्रशासनासमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 1:54 PM

गाळ काढल्यामुळे नदीतील पाणीसाठ्यात वाढ होणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगा, ताम्रपर्णी, हिरण्यकेशी आणि वेदगंगा या नद्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे. हा गाळ टाकण्याची ठिकाणे निश्चित झाल्यावर त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल. त्यामुळे गाळ टाकण्याच्या जागांची पाहणी करा व खर्चाचा आराखडा बनवा, अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका प्रशासक के.मंजुलक्ष्मी, जल अभियंता हर्षजीत घाटगे, जलसंपदा कार्यकारी अभियंता स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, पंचगंगेतील शिवाजी पूल, राजाराम बंधारा, शिये पूल व रुकडी बंधारा परिसर निश्चित केला आहे. तसेच अन्य नदीपात्रातील जागा निश्चित केल्या आहेत. मात्र, काढलेला गाळ टाकायचा कुठे, हे ठरलेले नाही. गाळ टाकण्याची ठिकाणे ब्लूू किंवा रेड पूररेषेमध्ये नसावीत. या गाळाचा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या.जिल्ह्यातील नद्यांना येणाऱ्या महापुराला त्यातील गाळ, नदीपात्रातील अनावश्यक बांधकाम, पुलांच्या बांधकामासाठी बांधलेले तात्पुरते रस्ते असे अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे हा गाळ काढावा, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे. महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेमध्येही नद्यांमधील गाळा काढावा, असे सांगण्यात आले आहे. याचा विचार करून जलसंपदा आणि आपत्ती निवारण विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून नद्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे. गाळ काढल्यामुळे नदीतील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी