शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उसंत; पंचगंगेची पातळी फुटाने कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 4:06 PM

अद्याप २८ बंधारे पाण्याखाली : पाच मार्गावरील वाहतूक बंद 

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत दिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असली तरी अद्याप २८ बंधारे पाण्याखाली आहेत. दोन राज्ये तर तीन प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद राहिल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. शुक्रवारी सकाळी ऊन पडले होते. त्यानंतर ११ वाजता जोरदार सरी कोसळल्या, पण दिवसभर उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट होत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदीचे पाणी २६ फुटांवर होते, ते सायंकाळी ५ वाजता २५ फुटापर्यंत खाली आले होते.शुक्रवारपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही. जिल्ह्यात भात व नागलीच्या रोप लागणीच्या कामाला गती आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १ लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जांबरे धरण भरले..चंदगड तालुक्यात घटप्रभा पाठोपाठ जांबरे धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची क्षमता ०.८२० टीएमसी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदी