शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कुंभी नदीच्या पाण्याला काळसर रंग, नदीकाठच्या अकरा गावांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 13:57 IST

कुंभी नदीवर सांगरूळ-कुडित्रे दरम्यान असलेल्या सांगरूळ धरण संस्थेचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला नोव्हेंबरमध्ये पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. यामुळे पाणी प्रवाहित होत नाही.

प्रकाश पाटील

कोपार्डे : कुंभी नदीतील पाण्याला काळपट, तांबूस रंग आला आहे. याच नदीतून काठावरील ११ गावांतील ग्रामस्थांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजना असल्याने हे पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

कुंभी नदीवर सांगरूळ-कुडित्रे दरम्यान असलेल्या सांगरूळ धरण संस्थेचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला नोव्हेंबरमध्ये पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. यामुळे पाणी प्रवाहित होत नाही. याशिवाय वळवाचापाऊस पडत असल्याने पावसाचे पाणी ओढ्यानाल्याने थेट नदीला मिळत आहे. यातून वाहत जाणारे गावागावांतील सांडपाणी थेट नदीला मिसळत आहे.

पावसाच्या हजेरीने शेतीपंप बंद असल्याने नदीच्या पाण्याचा उपसा होत नाही. बंधाऱ्यातील पाणी प्रवाहित करण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष देऊन नागरिकांना याबाबत पाणी उकळून पिण्यासाठी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा साथीच्या आजारांना सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाणी फिल्टरची योजना नाही

ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांना फिल्टर नाही. अनेक ग्रामपंचायती नदीतून पाणी उपसा करून ते पाण्याच्या टाकीत टाकतात व पाणी फिल्टर करण्याची योजना नसल्याने थेट आहे तसा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असून यातून साथीचे रोग पसरत आहेत.

पावडर वापरण्याचे ज्ञान नाही

पाण्याचे प्रदूषित प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामपंचायती टी सेल पावडरीचा हमखास वापर करतात; पण ती वापरण्याचे ज्ञान, कौशल्य कर्मचाऱ्यांना नसल्याने प्रमाणापेक्षा जास्त पावडरीचा वापर होतो. टी सेल पावडरीच्या अतिवापराने आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांगरूळ बंधाऱ्यात अडविण्यात आलेले पाणी वाहते करण्यासाठी आरोग्य विभागाने सूचना कराव्यात; अन्यथा साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. - भगवान देसाई, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, भामटे 

 कारणे शोधण्याचे शासकीय पातळीवर कोणतेच प्रयत्न होत नाहीत. गेल्या चार-आठ दिवसांपासून नदीतील अशुद्ध पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या पातळीवर याबाबत खबरदारी घ्यावी. - दिनेश पाटील, कोपार्डे ग्रामस्थ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण