शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

विनातारण कर्जही नाही अन् अनामत रकमेचे पैसेही बुडले, कोल्हापुरातील एका निधी बँकेचा अनेकांना गंडा

By विश्वास पाटील | Updated: July 19, 2024 14:18 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : तुम्हाला हवे तेवढे कर्ज आणि ते देखील कोणतेही तारण न घेता देतो, तुम्ही फक्त कर्जाच्या ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : तुम्हाला हवे तेवढे कर्ज आणि ते देखील कोणतेही तारण न घेता देतो, तुम्ही फक्त कर्जाच्या काही टक्के अनामत रक्कम रोख आमच्या बँकेत भरा, असे आमिष दाखवून नव्यानेच स्थापन झालेल्या एका निधी बँकेने अनेकांना गंडा घातल्याचे प्रकरण पुढे आले आहे. पैसे भरलेल्या एकाही व्यक्तीला कर्ज मिळालेले नाही आणि अनामत म्हणून घेतलेली रक्कमही परत मिळत नसल्याने कर्ज मागणारे हेलपाटे मारून बेजार झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार फसवणुकीचा आकडा काही लाखांत आहे.तारण द्यायला काहीच नसते; परंतु विविध कारणांसाठी कर्जाची गरज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नावावर घर नसते, शेतीचा सातबारा एकत्रित असतो. नोकरी खासगी असते, सोनेनाणे नसते मग तारण काय द्यायचे, असा प्रश्न असतो. त्यांना कर्ज हवे असते, त्याचे नियमित हप्ते परत करण्याचीही त्यांची तयारी असते. ही अगतिकता ओळखूनच या बँकेने विनातारण कर्जाचा जाहिरात केली. करवीर तालुक्यातील पश्चिमेकडील एका तरुणाचे लग्न ठरत नव्हते. त्यासाठी घराची डागडुजी त्याला करायची होती. त्यासाठी कर्ज हवे होते म्हणून त्याला कुणीतरी या बँकेचा पत्ता दिला. त्यानुसार तो मित्राला घेऊन बँकेत गेला. बँकेने तीनच नव्हे, तर पाच लाख देतो, असे आश्वासन त्यांना दिले. त्यानुसार त्यांनी १३,५०० रुपये ३ एप्रिल २०२४ ला बँकेत रोख भरले. सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला महिनाभर लागेल असे सांगितले; परंतु आता तीन महिने उलटून गेले तरी अजून कर्जाचा पत्ता नाही. कर्ज कधी मिळणार म्हणून मित्रासह तो हेलपाटे मारून दमला आहे. आता या बँकेचे कार्यालय रंकाळ्याजवळ आले आहे. तिथे अनेक लोक कर्ज तरी द्या किंवा आमची अनामत तरी परत द्या म्हणून गर्दी करीत आहेत. काहींनी ३५ हजार, काहींनी त्याहून जास्त रक्कम भरली आहे. जेवढी कर्ज जास्त तेवढी अनामत जास्त असा त्यांचा नियम आहे. आता तुमचे खाते अपडेट करण्यासाठी २ हजार रुपयांची एनईएफटी करा, असे त्याला सांगितले आहे; परंतु अनामत व नंतर एनईएफटी करूनही सहा-सहा महिने झाले तरी कुणाला कर्ज मिळालेले नाही.

भेटायचे कुणाला..?बँकेत कोणही जबाबदार अधिकारी भेटत नाही. लिपिक काम करणारे दहा ते बारा तरुण असतात. तेही सतत बदलतात. साहेब दिल्लीला गेले होते. त्यामुळे कर्जमंजुरी लांबली असल्याचे कारण बँकेतील लोक देत आहेत. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकfraudधोकेबाजी