शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:47 AM

''पंतप्रधानांचे महात्मा गांधी यांच्याविषयीचे विधान हास्यास्पद'' 

कोल्हापूर : देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत आहेत. यातून जनतेची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याने जनता सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला वैतागली आहे. यामुळे देशात व राज्यात सत्तांतर होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.चव्हाण म्हणाले, पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांची वागणूक भयानक होती. राज्यात भ्रष्टाचारी सरकार कार्यरत आहेत. अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत असल्याचे यातून दिसून आले. जनता याला कंटाळली असून, लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानाचाही चव्हाण यांनी समाचार घेतला. मोदी हे निवडणूक काळात सतत प्रचारात व्यस्त होते. यामुळे त्यांना काय बोलावे हे सुचेनासे झाले आहे. त्यांना उपचाराची गरज असून त्यांचे विधान हास्यास्पद असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

दुष्काळासाठी काँग्रेसची जिल्हानिहाय बैठकराज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करून सरकारने निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करत चव्हाण यांनी काँग्रेसने समित्या स्थापन केल्या असून लवकरच जिल्हानिहाय दुष्काळाचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले.

पी. एन. यांना मंत्रिपद मिळायला हवे होतेपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमदार पी. एन. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांना मंत्रिपद मिळायला हवे होते. मात्र, ते न मिळूनही ते कधी नाराज झाले नाहीत. लोकसभेला त्यांनी उभे राहावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. या लोकसभा निवडणुकीत स्वत: उमेदवार असल्यासारखे त्यांनी गाव ना गाव पिंजून काढत काँग्रेसचा प्रचार केला. अशा निष्ठावंत नेत्याच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, या शब्दांत चव्हाण यांनी पी. एन. यांना आदरांजली वाहिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदी