शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोठ्या पक्षाची जाहीर उमेदवारी मागे घेण्याची पहिलीच घटना, काँग्रेसला धक्का; सतेज पाटील यांची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:37 IST

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एखाद्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेच चक्क माघार घेण्याची जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना सोमवारी अर्ज ...

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एखाद्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेच चक्क माघार घेण्याची जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी घडली. कोल्हापूर उत्तरमधीलकाँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात झालेल्या घडामोडींनंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीसह काँग्रेसलाही मोठा धक्का बसला. कोल्हापूर उत्तरमधील घडामोडी या सुरुवातीपासूनच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरल्या. लोकसभेला त्यांनी शाहू छत्रपती यांना रिंगणात उतरवून त्यांच्यासाठी सगळी यंत्रणा राबवली व तब्बल २५ वर्षांनंतर हात चिन्हांवर काँग्रेसचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आणला. तेव्हापासून कोल्हापूर उत्तरचा उमेदवार कोण? ही उत्सुकता लागून राहिली होती.शाहू छत्रपती यांच्या प्रचारात पुढे असलेल्या मधुरिमाराजे यांचेच नांव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते; परंतु एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी हे कोल्हापूरला किती रुचेल, असा विचार झाल्याने छत्रपती घराण्यातूनच त्यांच्या उमेदवारीला परवानगी मिळाली नाही. एकदा त्या तयार नाहीत म्हटल्यावर काँग्रेसचे पर्याय मर्यादित झाले. पक्षाकडे वसंत मुळीक, राजू लाटकर, शारंगधर देशमुख, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, आनंद माने, दुर्वास कदम, आर. डी. पाटील यांनी मुलाखती दिल्या. त्यात मुळीक नव्या पिढीला कितपत चालतील, असा विचार झाल्याने त्यांचे नाव मागे पडले. माने, आर. डी. यांच्या स्वत:च्या मर्यादा होत्या. शारंगधर देशमुख हे मूळचे सांगली जिल्ह्यातील असल्याने कोल्हापूर कितपत स्वीकारेल, असा विचार झाला. सचिन चव्हाण हे मूळचे पेठेतील असल्याने त्यांचे नाव पुढे होते; परंतु महापालिकेच्या कुरघोडीच्या राजकारणातून ते नाव मागे पडले.

असूयाही कारणीभूत..उपलब्ध पर्यायातून पक्षाने राजू लाटकर यांना उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर होताच काहींची मजल काँग्रेस समितीवर दगडफेक करण्यापर्यंत गेली. काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी लाटकर नकोत, अशी मोहीमच उघडली. त्यासाठी सह्यांची मोहीमही राबविली. आपल्याबरोबरीचा कार्यकर्ता पुढे जातो, अशी असूयाही त्यामागे होती.

छत्रपती घराण्याकडे आग्रहसर्व असंतुष्टांनी छत्रपती घराण्याकडे आग्रह धरला आणि मधुरिमाराजे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी तयार केले. कार्यकर्त्यांच्या दबावापोटी आम्ही रिंगणात उतरत असल्याचे जाहीर केले आणि शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला.

कौटुंबिक दबावातून माघारीची नामुष्की..अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी धडाक्यात प्रचार सुरू केला. वृत्तपत्रांना भेटी दिल्या. अंबाबाई, भवानीमातेचे जाऊन दर्शन घेतले. गेली पाच दिवस त्या पायाला भिंगरी लावून त्यांच्या स्टाइलने प्रचारात उतरल्या होत्या; परंतु सोमवारी या सगळ्याच घडामोडींना धक्कादायकरीत्या ब्रेक लागला आणि पक्षांकडून उमेदवारी मिळाली असतानाही कौटुंबिक दबावातून अर्ज मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील