शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

पावसाच्या लहरीवरच ठरणार यंदाचा ऊस गाळप हंगाम

By विश्वास पाटील | Published: September 20, 2022 3:36 PM

परतीचा पाऊस दसऱ्यामध्ये पडला तर हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो असे आजचे चित्र आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने यंदाचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी धुराडे कधी पेटणार, हे पावसाच्या स्थितीवरच ठरणार आहे. परतीचा पाऊस दसऱ्यामध्ये पडला तर हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो असे आजचे चित्र आहे.यंदा दसरा ५ ऑक्टोबरला आहे. दिवाळी २४ ऑक्टोबरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजपासून पाऊस पूर्णत: पंधरा दिवस थांबला तरच १५ तारखेपासून हंगाम सुरू होईल अशी शेतीची स्थिती आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात शेतात पाणी आहे. अलीकडील काही वर्षांत दसऱ्यातही पाऊस होत आहे तसे झाल्यास जाहीर केलेल्या तारखेला कारखाने सुरू होण्यास अडचणी येतील असे दिसते. मराठवाड्यात पावसाची फारशी अडचण नाही परंतु तिथे कारखाने लवकर सुरू होत नाहीत. कारण तिथे आडसालीचे क्षेत्रच नसते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गाळपासाठी त्यांना ऊसच उपलब्ध नसतो.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस परिषद यंदा १५ ऑक्टोबरलाच आहे. यंदा एकरकमी एफआरपी देण्याची बहुतांशी सर्वच कारखान्यांची तयारी आहे. कोल्हापुरात जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी तशी घोषणाच केली आहे; परंतु संघटनेने एकरकमी एफआरपीच्यावर टनाला किती देणार ते सांगा मगच उसाला हात लावा, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील हंगामावर होऊ शकतो.

यंदा पाऊस सरासरीएवढा झाला असला तरी कुठेच महापूर आलेला नाही. ऊसपिकाला लागेल तसाच पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या पिकांचे अजिबात नुकसान झालेलेे नाही. परिणामी यंदाही गाळप जास्त होणार आहे. त्यामुळे हंगाम वेळेत सुरू करणे व त्यानुसार गाळपाचे नियोजन करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

चढ-उतार असेही..साखर उद्योगातील जाणकारांच्या मते कोणत्याही कारखान्याचा १८० दिवसांचा हंगाम हा आर्थिकदृष्या योग्य मानला जातो. परंतु राज्यातील हंगामामध्ये त्यात बरेच चढ-उतार आहेत. गत हंगामात कोल्हापूर-१४४ दिवस, पुणे- १८०, सोलापूर-१७२, अहमदनगर-१८१,औरंगाबाद-१८८, नांदेड-१९१,अमरावती-१६६ आणि नागपूर विभागात १२४ दिवस हंगाम सुरू राहिला.

तीन जिल्ह्यांतच निम्मे गाळप

गतवर्षी सोलापूर, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात ५६९ लाख टन गाळप झाले होते. राज्यात एकूण १३२० लाख टन गाळप झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यातील हंगाम १५ पासून सुरू होऊ शकतो. कारण तिथे ऊसही भरपूर आहे आणि पावसाचीही अडचण फारशी येत नाही. पाऊस झाला तरी जमिनी निचऱ्याच्या असल्याने तोडी सुरू करता येतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने