शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

मला संयमचा सल्ला देणाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ताकद लावावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:54 AM

कोल्हापूर : पूर ओसरून सव्वा महिना झाला तरी अजूनही भरपाईची रक्कम मिळालेली नाही. तातडीच्या आर्थिक मदतीचाही पत्ता नाही. यामुळे ...

कोल्हापूर : पूर ओसरून सव्वा महिना झाला तरी अजूनही भरपाईची रक्कम मिळालेली नाही. तातडीच्या आर्थिक मदतीचाही पत्ता नाही. यामुळे पूरग्रस्तांचा संयम सुटला आहे. यामुळे माझ्यासह पूरग्रस्तांना संयमचा सल्ला देणाऱ्या जिल्ह्यातील मंंत्र्यांनी आपली राजकीय ताकद वापरून सरकारकडून पूरग्रस्तांना भरीव मदत मिळवून द्यावी, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी दिला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांनी हा सल्ला दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदयात्रा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथून निघाली. या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, सन २००५, २००६, २०१९ मध्ये तातडीची आर्थिक मदत वेळेत मिळाली होती. आता पूरग्रस्तांना कपडे, भांडी खरेदीसाठीची रक्कमही अजून मिळालेली नाही. पूरग्रस्त सरकारकडे सूर्य, चंद्र मागत नाहीत. झालेल्या नुकसानीची भरपाई मागत आहेत. मंत्र्यांची दालने सजवण्यासाठी आणि साखर कारखान्यांची तीन हजार कोटींची थकबाकी माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत. पण पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी का पैसे नाहीत? राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी, पूरग्रस्तांची चेष्टा करीत आहे. म्हणून आत्मक्लेष करण्यासाठी पदयात्रा निघाली काढली आहे. आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. पूरग्रस्तांचे जगणं मुश्कील झाल्याने पदयात्रेने जाऊन ५ सप्टेंबरला नृसिंहवाडीत जलसमाधी आंदोलन होईल.

या वेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिदंर पाटील, माजी जि. प. सदस्य सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर यांच्यासह विविध पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

जिल्हाधिकारी कार्यालयातील टेबल, खूर्च्या

आंबेवाडी, प्रयाग चिखली पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूखंड दिल्याचे प्रशासन सांगत आहेत. पण यातील अनेक जणांच्या नावे दीर्घ काळानंतरही भूखंड झालेले नाहीत. भूखंड नावावर होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र आंदेालन करू. एक तर भूखंड नावावर करून घेऊ नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयातील टेबल, खुर्च्या तरी घेऊ येऊ. असे आंदोलन पदयात्रेनंतर करू, असे आश्वासन माजी खासदार शेट्टी यांनी दिले.

खात्यावर वर्ग तर मग

सानुग्रह अनुदान देण्यासाठी १७ कोटी रुपये आले आहेत. ते पात्र पूरग्रस्तांच्या खात्यावर वर्ग केले जात असल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात पूरग्रस्तांना रक्कम मिळालेली नाही. मग वर्ग केलेले पैसे कोठे जात आहेत? केंद्रीय आपत्ती निवारण निधीतूनही मदत मिळण्यास विलंब होत आहे. ही मदत केवळ गुजरातसाठीच आहे का? असाही प्रश्नही शेट्टी यांनी उपस्थित केला.