शिवजयंती संदर्भातील डिजिटल फलक पोलिसांकडून हटविले जाणार असल्याची अफवा पसरल्याने इचलकरंजीतील जनता चौकात गुरुवारी शेकडो युवक जमा झाले. यामुळे तणाव निर्माण झाला होता.इचलकरंजी : आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून जवाहरनगरमधून संचलनास सुरुवात केली. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी लावलेले डिजिटल फलक पोलिसांकडून हटविले जाणार असल्याची अफवा पसरल्याने जनता चौकामध्ये शेकडो युवक जमा झाले. जमाव अचानकपणे जमू लागल्यामुळे शॉपिंग सेंटर, शिवाजी उद्यान, लक्ष्मी मार्केट, मराठा मंडळ परिसरातील दुकाने बंद झाली. मात्र, आमदार सुरेश हाळवणकर व पोलिसांनी तेथे येऊन पोलिसांकडून फलक हटविले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तणाव निवळला.
अफवेमुळे इचलकरंजीत जमला हजारोंचा जमाव
By admin | Published: May 06, 2016 12:58 AM