शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

स्वच्छतेसाठी ‘गडहिंग्लज’च्या तीन सुपुत्रांचा गौरव

By admin | Published: October 04, 2015 11:22 PM

स्वच्छ महाराष्ट्र अभियान : मलकापूर, रोहा, चिपळूण, गुहागर झाले हागणदारीमुक्त

गडहिंग्लज : स्वच्छ महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्त झालेल्या राज्यातील १९ शहरांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत झाला. सत्कार झालेले १९ पैकी तीन मुख्याधिकारी गडहिंग्लज तालुक्याचे आहेत. त्यामुळे गडहिंग्लजकरांची कॉलर अभिमानाने ताठ झाली आहे.गतवर्षी केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची घोषणा झाली. उघड्यावर शौचास बसण्याचे शंभर टक्के बंद व्हावे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. राज्यात एकूण २८५ नगरपालिका व नगरपंचायती आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १९ नगरपालिकांनीच स्वत:हून स्वच्छतेचा संकल्प केला आणि आपले शहर हागणदारीमुक्त झाल्याचे राज्य शासनाला कळविले होते. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनुसार अहवालानंतर त्या पालिकांचा विशेष प्रशस्तिपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.‘हागणदारीमुक्त’ नगरीचा मान मिळविलेल्या रायगड जिल्ह्यातील रोहयोचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील व सातारा जिल्ह्यातील मलकापूरचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली हे दोघेही महागावचे, तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे हे मांगनूर तर्फ सावतवाडीचे आहेत. गडहिंग्लजच्या या सुपुत्रांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात गडहिंग्लजचा ठसा उमटविला आहे.मुख्याधिकारी पाटील यांनी यापूर्वी चिपळूण शहरदेखील हागणदारीमुक्त केले आहे. सध्या ते रोहा येथे कार्यरत आहेत. रोहामध्ये उघड्यावर शौचास बसण्याचा प्रकार त्यांनी पूर्णत: बंद केला आहे. संपूर्ण शहरात कुठेही कचराकुंडी दिसत नाही. दररोज घंटागाड्या फिरवून सुका व ओला कचरा संकलित केला जातो.मुख्याधिकारी तेली यांनी मलकापूर येथे रानातील वस्त्यांमध्ये १५५ वैयक्तिक शौचालये बांधून घेतली. त्याचबरोबर झोपडपट्टीमध्येही २० सार्वजनिक शौचालये बांधली. गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून जनजागृती केली. चोवीस तास नळपाणी पुरवठ्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वीरीत्या राबविला आहे.मुख्याधिकारी शिंगटे यांनीही गुहागरच्या सागरी किनाऱ्यावर उघड्यावर शौचास बसण्याच्या ठिकाणी विद्युतप्रकाशाची सोय करून बाकडी बसविली. त्यामुळे उघड्यावर शौचास बसणे बंद झाले आहे. ९८ वैयक्तिक शौचालये त्यांनी बांधून घेतली आहेत. त्याचबरोबर पर्यटकांसाठीही स्वच्छतागृहे व स्नानगृहे बांधण्याचा त्यांचा मानस आहे. (वार्ताहर)