शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

‘जलयुक्त शिवार’चे आज पोस्टमार्टम

By admin | Published: April 14, 2017 12:09 AM

पालकमंत्री सांगलीत : कृषी राज्यमंत्र्यांचीही उपस्थिती, शेती कनेक्शन्स, बोगस बियाणांचा प्रश्न

सांगली : रखडलेली २२ हजार शेतीपंपांची व घरगुती वीज कनेक्शन, बोगस बियाणे आणि जलयुक्त शिवार योजनेतील निकृष्ट कामे हे मुद्दे शुक्रवारी, १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या खरीप आढावा बैठकीत गाजण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.खरीप पेरणी हंगामापूर्वी दरवर्षी एप्रिल महिन्यात तयारीची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते. मागील आढावा बैठकीमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी, १३ हजार शेतीपंपांना वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे पिके वाळत असल्याचे सांगून, पैसे भरूनही त्यांना कनेक्शन मिळत नसल्याबद्दल नाराजीह व्यक्त केली होती. त्यावेळचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, महिन्यात शेतीपंपांच्या वीज कनेक्शनसाठी पैसे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. अनिल बाबर त्यावेळी उपस्थित होते. त्यामध्येही पैसे उपलब्ध करून देण्याची घोषणा झाली. पण गेल्या वर्षभरात काहीच निधी मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मागील सभेत असणारे प्रश्न जैसे थेच आहेत. सध्या शेतकरी आक्रमक झाले असून, जिल्ह्यातील खासदार, आमदारांकडे कैफियत मांडत आहेत. शिवाय घरगुती ९ हजार कनेक्शन रखडली आहेत.शुक्रवारी पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक होत आहे. यावेळी कृषी राज्यमंत्री खोत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कृषीपंपांच्या वीज कनेक्शनचा प्रश्न गाजण्याची शक्यता आहे. बोगस बियाणे आणि खते शेतकऱ्यांच्या माथी मारणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले नाही. यामुळे वर्षाला एखादी तरी बोगस कंपनी शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा गंडा घालून पसार होत आहे. यावरही ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.जलयुक्त शिवार योजनेतून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात निकृष्ट कामे झाल्याचा आरोप आहे. अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याबद्दल दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांकडून कोट्यवधीचा गंडाशेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करूनही त्यांना पैसे न देताच व्यापारी गायब झाले आहेत. तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस परिसरातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधीचा गंडा घातला आहे. या व्यापाऱ्यांची बाजार समित्यांनी कोणतीही नोंदणी केली नसल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. गुन्हे दाखल झाले आहेत. पण, अनेक व्यापाऱ्यांचा शोधच लागला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.