शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

टोपेसाहेब, कोल्हापुरातील कोरोना कमी का होत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:18 AM

समीर देशपांडे / कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक ...

समीर देशपांडे / कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. या वर्षीच्या केवळ साडेसहा महिन्यांत जिल्ह्यात एक लाख ३२ हजार ५५१ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले असून, केवळ दुसऱ्या लाटेत ३३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. सर्वांनी घरात राहणे पसंत केले. जेव्हा परवानगी दिली तेव्हाच नागरिक बाहेर पडले. तरीही ना कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली; ना मृत्यू कमी झाले. मग आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच यामागची कारणे स्पष्ट केली तर तशी उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

मे आणि जून या दोन महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. मे महिन्यात ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. प्रशासनाकडूनही नियमांच्या अंमलबजावणीमध्ये चाललेला धरसोडपणा आणि नागरिकांची बेफिकिरी या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थिती अजूनही नियंत्रणामध्ये आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. यापेक्षा आणखी काही कारणे आहेत का, याचाही ऊहापोह आरोग्यमंत्र्यांनी करण्याची गरज आहे.

चौकट

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची तुलनात्मक स्थिती

तपशील पहिली लाट दुसरी लाट

नमुना तपासणी ३०३५७९ १०१२८६१

पॉझिटिव्ह रुग्ण ४४,४३८ १.३२,५५१

दैनंदिन अधिकतम रुग्णसंख्या १७४७ २२०२

कोविड केअर सेंटर्स ६३ १९७

समर्पित कोविड रुग्णालये ४५ १०७

मृत्यू १७०९ ३३९२

दोन्ही लाटांतील पुरुष मृत्यू ३३७६

दोन्ही लाटांतील महिला मृत्यू १७०५

चौकट

दोन्ही लाटांतील बाधित रुग्णांची संक्षिप्त माहिती

कोरोनाबाधित रुग्ण १३.४४ टक्के

बरे झालेले रुग्ण ९१.१६ टक्के

सध्या क्रियाशील रुग्ण ७.२१ टक्के

मृत्यू २.९६ टक्के

चौकट

लसीकरण

लसीकरण उद्दिष्ट ३१ लाख ९४ हजार ९९४

पहिला डोस घेतलेले १० लाख १८ हजार ३०१

पहिला डोस टक्केवारी - ३२ टक्के

दुसरा डोस घेतलेले ४ लाख ३८ हजार ५४२

दुसरा डोस टक्केवारी १४ टक्के

चौकट

कोरोना स्थिती नियंत्रणात न येण्याची कारणे

१. मध्यंतरी झालेल्या काही निवडणुका

२. प्रशासनाने व्यवहारबंदी करण्यास लावलेला उशीर

३. स्थानिक पातळीवर न घेतलेली कडक भूमिका

४. नागरिकांची बेफिकिरी

चौकट

जनतेच्या मनातील प्रश्न

१ ‘गोकुळ’च्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला का?

२ गतवर्षीप्रमाणे शहर आणि गावपातळीवर कडक नियोजन झाले नाही, हे कारण आहे का?

३ जर गृह अलगीकरण हे संसर्गवाढीचे कारण असेल तर असे रुग्ण संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यासाठी तेथील व्यवस्था सुधारल्या का?

४. जिल्हाधिकाऱ्यांनी ६ एप्रिल रोजी जिल्हा आणि तालुकाबंदीचा काढलेला निर्णय तातडीने फिरवण्यात आला; ते संसर्गवाढीचे कारण आहे का?

५. टास्क फोर्सचे सदस्य दोन महिन्यांपूर्वी येऊन गेले. त्यांनी ज्या सूचना केल्या, त्यांचे पालन झाले का? झाले नसेल तर याला जबाबदार कोण?

६. प्रशासनाने सांगितल्यानुसार दुकाने बंद, दुकाने सुरू, घरातून बाहेर पडू नका हे सगळे व्यापारी, हातावरचे पोट असणारे छाेटे व्यावसायिक, जनतेने निमूटपणे सहन केले. अशावेळी सर्व राजकीय निवडी, बैठका, मेळावे हे सर्व काही व्यवस्थित सुरू आहे; हे असे का?

७. जर चाचण्या वाढवल्या म्हणून पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असेल तर हे राज्यात सर्वत्र धोरण आहे का फक्त कोल्हापुरातच?