शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून वाहतूक बंद, नागरिकांमधून संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 4:06 PM

पुलाजवळ मागील वर्षी पेक्षा पाणी पातळीत वाढ 

प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलाच्या मच्छिंद्रीपेक्षा दीड ते दोन फुटाने पाणीपातळी वाढली आहे. यामुळे पुलाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आर. बी. शिंदे यांनी प्रसिद्ध केले आहे. गेली आठ दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील चारही नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. बालिंगा पुलाजवळ पाणी पातळी मच्छिंद्री पेक्षाही दीड फुटाने वाढली आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे १३८ वर्षाचा ब्रिटिश कालीन दगडी बांधकामाचा पूल आहे. मच्छिंद्री होताच मागील वर्षी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरून होणारी सर्व वाहतूक बंद केली होती. यावर्षी बालिंगा पुलाची मच्छिंद्री होऊन दोन दिवस झाले आहे. सध्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने बालिंगा पुलाजवळ दोन्ही बाजूला सायंकाळपर्यंत रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागदेवाडी व साबळेवाडी फाटा या ठिकाणी बॅरॅकेट्स लावून वाहतूक बंद करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.लोकांचा संताप नागदेवाडी येथे उभा करण्यात आलेली बॅरॅकेट्स ये जा करणाऱ्या प्रवाशांनी रस्त्याच्या बाहेर फेकून आपला संताप व्यक्त केला आहे.

पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने वाहतूक सुरू ठेवून पुलाच्या सुरक्षेची जबाबदारी झटकता येणार नाही. राधानगरी चे दरवाजे सुटल्याने आणखी दीडदोन फुट पाणी पातळी वाढली आहे. सायंकाळ पर्यंत रस्त्यावर पाणी येणार आहे. तरीही सायंकाळ नंतर वाहतूक बंद करणार आहे - आर.बी. शिंदे (उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरTrafficवाहतूक कोंडी