शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

आरक्षणाच्या मागणीवर प्रशिक्षण संस्थेचा उतारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 1:15 AM

शासनाचा प्रस्ताव : मराठा तरुणांसाठी ‘बार्टी’च्या धर्तीवर संस्था सरकार लवकरच करणार घोषणा

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय न्यायालयावर सोपवून, या समाजातील युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या धर्तीवर संस्था स्थापन करण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केली असून, लवकरच या संस्थेची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. आज स्पर्धा परीक्षेपासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंत अनेक ठिकाणी मराठा समाजातील तरुणांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. अगदी मुलाखत कशी द्यावी, इथंपासून ते संशोधनाच्या विविध विभागांमध्ये मराठी मुले मागे पडतात. इंग्रजीमध्ये बोलणे, लेखन या सर्वच बाबतींत नेहमीपेक्षा वेगळ्या प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. असे व्यावसायिक प्रशिक्षण बाहेर घ्यायचे झाल्यास त्याचा खर्चही मोठा आहे. काय आहे नेमकी ‘बार्टी’ संस्था च्डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आणि याबाबत अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे, यासाठी १९७८ साली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’ची मुंबईत स्थापना करण्यात आली. च्नंतर ही संस्था पुण्यात स्थलांतरित करण्यात आली. २००८ साली या संस्थेचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले. याच वर्षी ही संस्था स्वायत्त झाली; तर २०१२ साली येथे २६७ पदांना मान्यता मिळाली. च्कौशल्य विकास, संशोधन, मूल्यमापन, प्रशिक्षण, युवा नेतृत्व, समतादूत अशा विविध योजनांची सुरुवात करण्यात आली. या सर्व योजना अनुसूचित जाती-जमातींसाठी आहेत. २०१२ च्या निर्णयानुसार या संस्थेच्या महासंचालकांची जात पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक म्हणून घोषणा करण्यात आली. च्‘बार्टी’ला शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असून, त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, विविध शिष्यवृत्ती देण्यात येतात. राजर्षी शाहू महाराजांचे नाव द्यावे छत्रपती शाहू महाराजांच्या नावे किमान कौशल्य विकास, उद्योग व नोकरी यासाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावी, ही मागणी कोल्हापूर येथील मराठा क्रांती मूक मोर्चाने केली होती. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात याचा स्पष्ट उल्लेखही करण्यात आला आहे. याबाबत शासनाने आधीच तयारी केली असून, लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार या संस्थेला शाहू महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. कौशल्यपूर्ण प्रशिक्षण च् या सर्व परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने अनुसूचित जातिजमातींसाठी असलेल्या ‘बार्टी’च्या धर्तीवर अशा प्रकारची प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. च्या माध्यमातून विविध कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार असून, या युवक-युवतींनी रोजगाराभिमुख शैक्षणिक विविध कौशल्ये आत्मसात करावीत आणि अर्थार्जनासाठी या कौशल्यांचा वापर करावा, अशी त्यामागील भूमिका आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.