शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

भुदरगड प्रांताधिकाºयांची बदली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:46 AM

* मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी व सर्फनाला धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी असलेले भुदरगडचे प्रांताधिकारी ...

* मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा

आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी व सर्फनाला धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी असलेले भुदरगडचे प्रांताधिकारी असंवेदनशील व बेजबाबदारपणे भूमिका घेत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न रेंगाळले आहेत. अशा प्रांताधिकाऱ्यांची तातडीने बदली करा किंवा पुनर्वसनाची जबाबदारी काढून घ्या, अशी मागणी करीत धरणग्रस्तांनी आज धरणाचे काम बंद पाडले, तर याच मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) आजरा तहसील कार्यालयावर धरणग्रस्तांचा मोर्चा काढणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे उचंगी व सर्फनाला हे प्रकल्प गेली अनेक वर्षांपासून रेंगाळले आहेत. धरणग्रस्तांकडून पुनर्वसनाचे प्रश्न वारंवार सांगूनही सुटलेले नाहीत. पुनर्वसनाची जबाबदारी असणारे भुदरगडचे प्रांताधिकारी धरणग्रस्तांच्या विरोधी भूमिका घेऊन काम करीत आहेत.

पुनर्वसन कायदा धाब्यावर बसवून, कायद्यातील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावून धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा हक्क नाकारला जात आहे. धरणग्रस्तांना लेखी नोटिसा काढून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा उद्योग प्रांताधिकारी यांनी राजरोसपणे सुरू ठेवला आहे. त्यामुळे धरणग्रस्तांचा अशा अधिकाऱ्यांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांची बदली करा किंवा पुनर्वसनाचे अधिकार काढून घ्या, अशी मागणीही निवेदनातून केली आहे.

धरणग्रस्तांच्या सहकार्यामुळे धरणाचे काम सुरू आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसनापूर्वीच धरणाची घळभरणी करून पाणी अडविण्याचे नियोजन सुरू आहे. याला धरणग्रस्तांचा विरोध आहे.

निवेदनावर, संजय तर्डेकर, संजय भडांगे, प्रकाश मणकेकर, सुरेश पाटील, दत्तात्रय बापट यासह धरणग्रस्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

------------------------------

* उचंगी धरणस्थळावर काम बंद पाडण्यासाठी जमा झालेले धरणग्रस्त.

क्रमांक : ०५०२२०२१-गड-११