शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

कोल्हापूरचे प्रवासी बंगळुरू, बेळगावमार्गे मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 3:39 PM

मुंबई- कोल्हापूर विमानसेवा अनियमित आणि वारंवार खंडित होत असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. त्यांना बेळगाव, बंगळुरूमार्गे मुंबईला जावे लागत आहे. ही सेवा नियमित करण्याबाबत शासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

कोल्हापूर : मुंबई- कोल्हापूर विमानसेवा अनियमित आणि वारंवार खंडित होत असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. त्यांना बेळगाव, बंगळुरूमार्गे मुंबईला जावे लागत आहे. ही सेवा नियमित करण्याबाबत शासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

कोल्हापूर- मुंबई मार्गावर आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी ट्रूजेट कंपनीकडून विमानसेवा पुरविली जाते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे सप्टेंबरमध्ये काही दिवस विमानसेवा स्थगित झाली. त्यानंतर कंपनीकडून दि.१२ ऑक्टोबरपासून सेवा पुन्हा सुरू झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि दिवाळीची सुट्टी असल्याने प्रवाशांची संख्या वाढली. सध्या रोज मुंबईहून सरासरी ६० प्रवासी कोल्हापुरात येतात, तर येथून ४० जण मुंबईला जातात. त्यात कोल्हापूर, सांगलीतील प्रवाशांचा अधिक समावेश आहे. तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारपासून सेवा खंडित झाली. सेवा अनियमित असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. अनेक प्रवासी बंगळुरू, बेळगावमार्गे मुंबईला जात आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असूनही केवळ सेवेतील अनियमिततेचा कोल्हापूरला फटका बसत आहे.

उद्योग, व्यवसाय आदी कारणांसाठी मुंबईला जाणाऱ्या आणि तेथून कोल्हापूरला येणाऱ्या विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. वारंवार सेवा खंडित होत असल्याने त्यांची अडचण होत आहे. शासनाने गांभीर्याने विचार करून सेवा नियमित करावी. जर सध्याच्या कंपनीला नियमित सेवा देणे शक्य होत नसेल, तर संबंधित कंपनी बदलावी. -संजय शेटे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

पुढील आठवड्यातही सेवेची शक्यता कमी

ट्रूजेट कंपनीच्या संकेतस्थळावर दि.१६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान तिकीट नोंदणी दाखवीत नाही. त्यामुळे पुढील आठवड्यातही सेवा सुरू होण्याची शक्यता कमी दिसते. प्रवाशांच्या दृष्टीने विचार करता सेवा नियमितपणे सुरू होणे आवश्यक आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया पर्यटनतज्ज्ञ बी.व्ही. वराडे यांनी व्यक्त केली.