शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी दोनशे शाळांचे ८५ कोटी रुपये थकले, संस्थाचालक अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 5:16 PM

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे

पोपट पवारकोल्हापूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठीचे अनुदान शासनाकडून संबंधित शाळांना दिले जाते; मात्र गेल्या बारा वर्षांपासून जिल्ह्यातील २०० हून अधिक शाळांचे ८५ कोटी रुपये सरकारकडे थकले आहेत. विशेष म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांपासून एक रुपयाही शाळांना दिला नसल्याने शाळा चालवायच्या कशा, असा सवाल संस्थाचालकांमधून उपस्थित होत आहे. आरटीईतून वंचित, दुर्बल घटकांना माेफत शिक्षणाचा डंका पिटणाऱ्या सरकारने अनुदानाची रक्कम थकवून शाळांची मात्र कोंडी केली आहे.शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. यातून वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २५ टक्के जागांवर प्रवेश देणाऱ्या शाळांना प्रति विद्यार्थी १७ हजार ६७० रुपये इतके सरकारकडून प्रतिपूर्ती अनुदान दिले जाते. प्रत्येक वर्षी शाळांना हे अनुदान देण्याचा नियम आहे; मात्र हे अनुदान वेळेत कधीच मिळत नसल्याने संस्थाचालकांची अडचण झाली आहे.

काही शाळांची कोटीपर्यत रक्कम थकलीकाेल्हापूर जिल्ह्यात ३२५ शाळांमध्ये यंदा आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत. यातील बहुतांश शाळांची रक्कम २०१२ पासून मिळालेली नाही. काही शाळांची कोटीपर्यंत रक्कम थकली असताना त्यांना केवळ दोन-तीन लाख रुपयेच अनुदान मिळाले आहे. त्यामुळे अशी रक्कम घेऊन आम्ही शाळा चालवायच्या कशा असा सवाल संस्थाचालक करत आहेत. जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत शाळांना २०२० पासून एक रुपयाचेही अनुदान मिळालेले नाही.

पालकांचा दबावशाळांच्या भौतिक सुविधा, शिक्षकांचे मानधन, या सर्व आर्थिक गोष्टींचाही शाळांना विचार करावा लागतो. सरकार अनुदान देत नसल्याने काही शाळांनी २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यास नकारघंटा दर्शविताच पालक थेट कायद्याची भीती दाखवत आहेत. एकीकडे हक्काचे अनुदान मिळेना तर दुसरीकडे कायद्याची भीती या दुहेरी कात्रीत संस्थाचालक अडकले आहेत.

गेल्या सात ते आठ वर्षांपासून आम्हाला अनुदान मिळालेले नाही. सरकार अनुदान देत नाही म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचे प्रवेश कधीच अडवत नाही. आमची थकीत रक्कम कोटीपर्यंत गेली आहे; मात्र केवळ दोन-तीन लाख रुपयेच दिले आहेत.अशात आम्ही शाळा कशा चालवायच्या. - नीलराजे बावडेकर, उपाध्यक्ष माईसाहेब बावडेकर प्रशाला कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळा