शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

चारचाकी वाहनांवरील ताबा सुटल्याने चारचाकी ओढ्यात कोसळून दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 7:24 PM

गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी ओढ्यात कोसळली.

शिवाजी सावंत,  गारगोटी: गारगोटी पाटगाव महामार्गावर भरधाव वेगाने चाललेल्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी ओढ्यात कोसळून दोन महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू झाला.आदिल कासम शेख (वय १९) आणि झहीर जावेद शेख (वय १९)(दोघेही रा. अनफ खुर्द, ता.भुदरगड , जि.कोल्हापूर)अशी मृत तरुणांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,आदिल शेख आणि झहीर शेख हे दोघे महाविद्यालयीन युवक सकाळी बाराच्या सुमारास अणफ खुर्द येथून गारगोटीकडे आपल्या आय २० ह्या चारचाकीतून(क्र. एम एच १२केजे ६५५०)चालले होते.आदिल शेख हा गाडी चालवीत होता. दरम्यान ते दासेवाडी येथील आप्पा वरंडेकर यांच्या शेता जवळील ओढ्या नजिक आल्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी ओढ्यात कोसळली.

हा ओढा या गावालगत असल्याने गाडी ओढ्यात कोसळताना जोरात आवाज झाला.हा आवाज ऐकून आपा वरंडेकर, सात्तापा चिले, राजु पोवार,निसार नाईक, अलिम नाईक, आणफचे माजी सरपंच रफीक शेख,जयसिंग वरंडेकर ,उमाकांत चांदम हे तेथे पोहचले.पण ओढ्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह प्रचंड वेगवान असल्याने पाण्यात जावून मदतकार्य करून त्यांना बाहेर काढणे कठीण होत होते.पण त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या दोन जखमी युवकांना बाहेर काढले.मदतीसाठी सरसावलेल्या या बहाद्दर समजसेवकांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

त्यांना उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणले असता झहीर याचा मृत्यू झाला.तर आदिल याला कोल्हापूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. बेदरकार वाहन चलविल्याने या दोन युवकांचा हकनाक बळी गेला आहे.यापूर्वी या गावाना कधीही रस्ते सुस्थितीत नव्हते.पण सद्या दोन पदरी हायब्रीड अन्युईटी तंत्रज्ञानात रस्ते केल्याने गाडी चालवताना वेगाचे भान राहत नाही.पालक ही तरूणांच्या हातात गाडी देताना समज देत नसल्याने बेभान झालेली तरुणाई अपघातास आमंत्रण देत आहे.

टॅग्स :Accidentअपघात