शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
5
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
6
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
7
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
8
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
9
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
10
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
11
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
12
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
13
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
14
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
16
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
17
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
18
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
19
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
20
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

महापुराने जळण झालेला ऊस पेटविण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:30 AM

शिरोळ : जुलैमध्ये आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यात जवळपास सोळा हजार हेक्टर ऊस पिकाला फटका बसला आहे. यामध्ये पंधरा टक्के ...

शिरोळ : जुलैमध्ये आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यात जवळपास सोळा हजार हेक्टर ऊस पिकाला फटका बसला आहे. यामध्ये पंधरा टक्के ऊस मोठ्याप्रमाणात बाधित झाल्यामुळे त्याचे जळण झाले आहे. त्यामुळे शेतकरी असा ऊस पेटवून देत आहेत. तर गळीत हंगाम वेळेत सुरू होऊन आपला ऊस लवकर तुटून जावा, अशी मानसिकता शेतकऱ्यांची आहे.

कृष्णेसह, पंचगंगा, वारणा व दुधगंगा नद्यांना महापूर आल्यामुळे शिरोळ तालुक्यातील ४३ गावांना फटका बसला आहे. यामध्ये शेतीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक दिवस ऊस पिकात पाणी साचून राहिल्याने नदीकाठावरील पिकांचे अक्षरश: जळण झाले. शेती विभागाकडून पंचनामे जवळपास पूर्ण होत आले आहेत. त्यामुळे जळण झालेला ऊस शेतकरी पेटवू लागले आहेत. तर पंचनामे न झालेला बाधित ऊस भकास दिसू लागला आहे. प्रत्येकवर्षी महापूर येणार असेल, तर शेती पिकवायची की नाही, अशी शेतकऱ्यांची मानसिकता असली तरी शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांना शेतजमीन स्वच्छ करून दुसऱ्या पिकासाठी जमीन तयारी करावी लागत आहे. बियाणे, खतांचा खर्च वाया गेला असून, शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

फोटो - २४०८२०२१-जेएवाय-०६, ०७ फोटो ओळ - शिरोळ तालुक्यातील नदीकाठावरील ऊस पिकाचे जळण झाल्यामुळे शेतकरी ते पेटवून देत आहेत. (छाया- सुभाष गुरव, शिरोळ)