शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

उदगाव-जयसिंगपूर ओढ्याचा गाळ काढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:25 AM

उदगाव : उदगाव-जयसिंगपूर ते कृष्णा नदी अशा असलेल्या मोठ्या ओढ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा गाळ न काढल्याने पूर ...

उदगाव : उदगाव-जयसिंगपूर ते कृष्णा नदी अशा असलेल्या मोठ्या ओढ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा गाळ न काढल्याने पूर परिस्थितीमध्ये पाणी तुंबून राहत असल्याने रस्ते बंद होत आहेत. यावर शेतकऱ्यांनी आवाज उठविला होता. त्यासाठी उदगाव ग्रामपंचायतीकडून पालकमंत्री सतेज पाटील यांनी १ सप्टेंबरपासून गाळ काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये या ओढ्याचे प्राधान्याने काम सुरू करावे, असे निवेदन तहसीलदार अपर्णा मोरे यांना देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की, जयसिंगपूर ते उदगाव कृष्णा नदीकाठापर्यंत ओढ्यातील गाळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. २०२१ च्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साठल्याने शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात त्याचे नुकसान होऊ नये म्हणून ओढ्यातील गाळ काढावा, खोलीकरण व रुंदीकरणाची मोहीम हाती घेऊन प्राधान्याने उदगावचा विचार करावा, असे म्हटले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही ओढ्यांचा गाळ काढणे, रुंदीकरण करणे यांवर वादळी चर्चा झाली होती. मोहीम सुरू झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार मोरे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच रमेश मगदूम, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - २५०८२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - उदगाव-जयसिंगपूर ओढ्याचा गाळ काढावा, या प्रश्नी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसरपंच रमेश मगदूम, जगन्नाथ पुजारी उपस्थित होते.