शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

कारभारवाडीची सर्व शेती ‘ठिबक’खाली

By admin | Published: January 30, 2015 9:52 PM

पाण्याची ४० टक्के बचत : उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ; संगणकीकृत प्रकल्प

दीपक मेटील - सडोली खालसा-- पाण्याच्या अतिवापरामुळे शेती नापीक होऊन उत्पादन क्षमता घटत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. उत्पादन वाढीसाठी व पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी कारभारवाडी (ता. करवीर) या गावातील शिवाजी पाटील पाणीपुरवठा संस्थेने सर्व शेती ठिबक सिंचनाखाली आणली आहे. त्यामुळे पाण्याची ४० टक्के बचत, तर उत्पादनात ३० टक्के वाढ होणार आहे. हा ठिबक सिंचन प्रकल्प संपूर्ण संगणकीकृत असल्याने पिकांना पाणी, औषधे, खते एकाच क्लिकवर मिळणार आहेत.कारभारवाडी, सडोली (खालसा) गावातील उपगाव येथील लोकसंख्या ४५० असून, ६० कुटुंबे आहेत. गावासाठी १०५ हेक्टर इतके जमिनीचे क्षेत्र असून ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफुल व अन्य पिके घेतली जातात. पिकांना भोगावती नदीवरून संस्थेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. योग्य नियोजनामुळे या संस्थेचा खर्च वजा जाता जिल्हा बॅँकेत ठेवी आहेत. पाण्याचा अतिवापर व लोडशेडिंग या कारणाने योग्य उत्पादन मिळत नसल्यामुळे गावातील तरुण शेतकऱ्यांनी इफको खत कंपनी, कृषी विभाग यांच्या माध्यमातून ठिबक सिंचनचा एकमुखी निर्णय घेतला.या प्रकल्पासाठी एकरी एक लाख रुपये खर्च येणार आहे. नाबार्ड व कोल्हापूर जिल्हा बॅँक यांच्या माध्यमातून सखाराम पाटील, हरी रामजी पाटील, भैरवनाथ कारभारवाडी, भैरवनाथ गाडेगोंडवाडी या विकास संस्थांकडून ७२ लाख रुपये कर्ज मिळाले आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे ४० टक्के पाणीवापर कमी व ३० टक्के उत्पादन वाढणार आहे. ‘एकी हेच बळ’, या म्हणीप्रमाणे कारभारवाडी गावचा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे.या उपक्रमासाठी इफको खत कंपनी, केडीसीसी बॅँक, नाबार्ड बॅँक, कृषी विभाग, भोगावती कारखाना, विकास संस्था यांचे सहकार्य लाभले आहे.एकरी ४१ हजार रुपयांचे अनुदानया प्रकल्पासाठी एकरी एक लाख खर्च येणार आहे, तर महाराष्ट्र राज्य १५ हजार, केंद्र सरकार १५ हजार, भोगावती साखर कारखाना सात हजार, इफको खत कंपनी चार हजार, असे एकूण ४१ हजार प्रति एकर अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.भोगावती साखर कारखान्याने ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी सात हजार रुपये अनुदान दिले असून, शासनाने शंभर टक्के अनुदान देण्याची गरज आहे, तरच पाणी वाचविण्यासाठी सर्व शेतकरी प्रयत्न करतील.- धैर्यशील पाटील (कौलवकर), अध्यक्ष, भोगावती साखर कारखाना.शेतीला कृषी तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती किफायतशीर ठरेल. शेती आदर्श व्यवसाय ठरावा, यासाठी शेतकऱ्यांनी वाडीची सर्व शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.- प्रा. नेताजी पाटीलअध्यक्ष, कै. शिवाजी पाटील पाणीपुरवठा संस्था.