शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
काँग्रेस निवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा पोटनिवडणूक एकटी लढण्याची शक्यता
3
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
4
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
5
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
6
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
7
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
8
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
9
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
10
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
11
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार
12
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
13
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
14
Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स
15
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
16
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
17
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
18
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
19
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन
20
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी

ऊसतोड मजूर बनले शेतमजूर

By admin | Published: May 04, 2016 12:06 AM

दुष्काळाचा परिणाम : गळीत हंगाम संपूनही मजूर अद्याप गावातच

गणपती कोळी --कुरूंदवाड --उसाचा गळीत हंगाम संपण्यापूर्वीच ऊसतोड मजुरांना गावाकडे परतीचा वेध लागलेला असतो़ यंदाचा गळीत हंगाम संपून आठवडा संपला तरी अनेक भागात ऊसतोड मजूर अद्याप गावातच आहेत़ गावाकडे पाणीच नसल्याने जनावरे कशी जगवायची म्हणून याच भागात राहून शेतीच्या कामाच्या शोधात आहेत़ कोल्हापूर जिल्हा पाण्यासाठी समृध्द असल्याने या भागात ऊस शेती मोठी आहे़ त्यामुळे या पिकांवर प्रक्रिया करणारे साखर कारखानेही मोठ्या प्रमाणात आहेत. याउलट इंडी या भागातील शेतकऱ्यांची शेती मोठी असूनही शेतीसाठी पाण्याची कमतरता असल्याने या भागातील बहुतांश शेतकरी मजुरी मिळविण्यासाठी ऊसतोडीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सहा ते सात महिने जनावरे व कुटुंबाला घेऊन ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतर करत असतात़मजूरांच्या गावाकडे शेतीवाडी असूनही पाण्याअभावी पावसाळी पिकेच घेतली जातात़ संसाराचा गाढा ऊस ठेकेदार मुकादम, वाहनमालक यांच्याकडून उचलीवर व जनावरांच्या दुभत्यावर चालतो़ उसाचा गळीत हंगाम संपत आला की या मजुरांना गड्या आपला गाव बरा म्हणून गावाकडे परतण्याची ओढ लागलेली असते़ यंदा बीड, उस्मानाबाद, लातूर, कर्नाटकातील इंडी, जालना या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता वाढली आहे़ कुपनलिका, विहिरी आटल्याने माणसांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे़ त्यामुळे जनावरांना चारा तर नाहीच शिवाय त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणेही कठीण बनले आहे़ त्यामुळे ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांनी गावाकडे असलेल्या नातेवाईकांशी संपर्क करुन परिस्थितीची माहिती घेऊन किमान एखादा वळवाचा पाऊस पडून विहीर, कूपनलिकांना पाणी येईपर्यंत ऊसतोडीच्या भागातच राहण्याचा निर्णय घेतला आहे़ ऊसतोड करणाऱ्या मजुरांना शेतातील मजुरीची कामे फारसे जमत नाही़ मात्र परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी व रोजचा चरितार्थ चालविण्यासाठी शेतीच्या कामाच्या शोधात लागले आहेत़ दुष्काळाची छाया कोल्हापूर जिल्ह्यातही जाणवत असून, नदीतील पाणी आटल्याने पाण्याअभावी या भागातील उभे पिकही करपू लागले आहेत़ त्यामुळे शेतीची कामेही ठप्प असल्याने या ऊसतोड मजुरांना मजुरीअभावीही हाल सोसावे लागत आहे़