शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Kolhapur: "हे राम ते जय श्रीराम"पर्यंतचा प्रवास समजून घ्या - बी. जी. कोळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:23 IST

'करकरेंच्या खुनाचा कट गांधींजींपेक्षा भयंकर'

कोल्हापूर : सत्ताधाऱ्यांचा हे राम ते जय श्रीरामपर्यंतचा प्रवास समजून घेतला पाहिजे, आज जर आमच्या हाती लेखणी दिली तर आम्ही संविधान लिहूया, तलवार दिलीत तर भीमा कोरेगाव करूया अशाही संतप्त भावना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केल्या.भाकप, श्रमिक प्रतिष्ठान आणि आयटकतर्फे शहीद गोविंद पानसरे शहीद दिनानिमित्त शाहू स्मारकमध्ये ''पानसरेंना न्याय कधी'' या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी होते. पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.कोळसे-पाटील म्हणाले, गोविंद पानसरे हे ज्ञानेश्वरांच्या भाषेत समजावून सांगतात आम्ही तुकोबांच्या. परंतु सत्ताधाऱ्यांचे षड्यंत्र समजावून सांगण्यात आमची हयात जात आहे. विचाराला विचाराने उत्तर द्या हे अण्णांचे सांगणे होते. गोळवलकर, सावरकर, टिळक वाचा, त्यातील लिखाण विषारी आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा खून हे त्याचे द्योतक आहे. खून, दंगली, मशिदी पाडणे हे त्यांच्या या विषारी प्रसाराचे दाखले आहेत. यात देशातील सर्व संवैधानिक संस्थांना हाताशी धरले. स्मिता पानसरे म्हणाल्या, आम्ही सारे पानसरे म्हणून अभिनिवेश बाजूला ठेवून अण्णांनी मांडलेला शत्रू मित्र विवेक जोपासला पाहिजे. प्रा. डॉ. चौसाळकर म्हणाले, पानसरे यांचा खून होऊन १० वर्षे झाली, तरी गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही. आपली न्यायव्यवस्था त्यांना योग्य न्याय देऊ शकत नाही. पानसरे यांनी जनतेची चळवळ उभी केली, ती पुढे नेली पाहिजे. मानवजातीच्या मुक्तीसाठी संघर्ष करा.

करकरेंच्या खुनाचा कट गांधींजींपेक्षा भयंकरकरकरे यांच्या खुनामागेही हीच शक्ती होती. गांधींना मारण्याचा कट रचला त्यापेक्षाही अक्कलहुशारीने त्यांनी एकविसाव्या शतकात करकरे यांना मारण्याचा कट रचला. हा भयंकर कट पानसरे व्याख्यानातून उलगडत होते, म्हणूनच त्यांची हत्या झाली असे कोळसे-पाटील यांनी सांगितले.

घाबरून घरी मरण्यापेक्षा लढत मरावयाच्या ४७ व्या वर्षीच मी घाबरणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यामुळे देशाची सर्वांत मोठा शत्रू आरएसएस, विषारी विचारांची प्रेरणा देणारा ब्राह्मणवाद, त्याला घाबरून घरी राहून एसीत मरायचे की रस्त्यावर उतरून लढत लढत मरायचे याचा निर्णय घ्यायची वेळ आली आहे असा सल्ला कोळसे-पाटील यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरे