शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

‘अप्रगत विद्यार्थी शोध’चे पेपर फुटले

By admin | Published: September 19, 2015 12:00 AM

सोईने घेतल्या परीक्षा : शाळांना सुट्या प्रश्नपत्रिकांचे वाटप; गोपनीयतेचा भंग

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर  इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्यस्तरावर तयार केलेली प्रश्नपत्रिका जिल्ह्यात फुटली आहे. सर्व शाळांमध्ये सुट्या प्रश्नपत्रिका एकाचवेळी पोहोच केल्या आहेत. मात्र, एकाच दिवशी ही परीक्षा घेणे बंधनकारक नसल्यामुळे सोईने परीक्षा घेतली जात आहे. यामध्ये गोपनीयतेचा भंग झाल्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांची वस्तुस्थितिदर्शक माहिती मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी, ही चाचणी परीक्षा केवळ फार्स ठरणार आहे.शासनाच्या शालेय व क्रीडा विभागातर्फे प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत यंदापासून अप्रगत विद्यार्थी शोधले जात आहेत. यासाठी शासकीय, खासगी शाळांतील दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. मिळालेल्या अप्रगत विद्यार्थ्यांना दोन वर्षांत प्रगत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासंबंधी जिल्हास्तरावर शिक्षण विभागाला प्रशिक्षण दिले आहे. गणित आणि भाषा विषयांची चाचणी १४ ते ३० सप्टेंबरअखेर घेण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रश्नपत्रिका तयार करून त्या जिल्हा शिक्षण प्रशासनातर्फे शाळास्तरावर वितरित केल्या आहेत. भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिका चार दिवसांपूर्वीच शाळा स्तरावर पोहोच केल्या आहेत. गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका वाटण्याची प्रक्रिया सुरू आहे. शाळानिहाय प्रश्नपत्रिका देताना त्या पॅकिंग न करता सुट्या स्वरूपात मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केल्या आहेत. गोपनीयताच नसल्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. रीतसर चाचणी घेण्याआधीच बहुतांश शाळांत प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. सरावही करून घेतला जात आहे. एकाच दिवशी परीक्षा नसल्यामुळे प्रश्नपत्रिकांची सहजपणे देवाणघेवाण सुरू आहे. प्रश्नपत्रिका शिक्षक, विद्यार्थी यांना सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ही चाचणी परीक्षा केवळ फार्स ठरणार आहे. आधीच प्रश्नपत्रिका मिळाल्याने आणि सोयीनुसार परीक्षा घेतल्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांचा ठपका घ्यायचा नाही, म्हणून सर्वांनाच प्रगत दाखविण्याची संधी मुख्याध्यापक, शिक्षक यांना आयतीच मिळाली आहे. त्यामुळे अप्रगत विद्यार्थी मिळणार कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही चाचणी परीक्षा गोपनीय ठेवायची नाही, सोयीनुसार घ्यायची, असा वरिष्ठांचाच आदेश असल्याचा युक्तिवाद जिल्हास्तरीय शिक्षण प्रशासन करीत आहे. गोपनीयता नसेल तर चाचणी कसली, असा प्रश्न पालक विचारीत आहेत. त्यामुळे ‘शाळाबाह्य’प्रमाणेच अप्रगत विद्यार्थी शोधमोहिमेतही प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात अप्रगत असलेले विद्यार्थीही प्रगत दाखविणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे शासनाचा मूळ उद्देशच बाजूला पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.