शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

केंद्राच्या धोरणांमुळेच वाढती बेरोजगारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:44 PM

मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन रोजगारनिर्मिती धोक्यात येऊन बेरोजगारी वाढू लागली

जयसिंगपूर : देशामध्ये वाढत चाललेल्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढू लागलेला आहे. भीषण महागाई व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक व व्यापार क्षेत्रामध्ये प्रचंड मंदी आलेली आहे. या सर्व गोष्टीस केंद्र सरकारचे चुकीचे व धरसोडीचे धोरण कारणीभूत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.दिल्ली येथील जंतर-मंतर येथे रविवारी राष्ट्रीय रोजगार निती कायदा करण्याबाबत सुरू असलेल्या रोजगार आंदोलनावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, देशामध्ये प्रत्येक रिकाम्या हाताला काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे. देशामध्ये वाढत असलेल्या बेरोजगारीबाबत केंद्र सरकारला गांभीर्य नसून, मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन रोजगारनिर्मिती धोक्यात येऊन बेरोजगारी वाढू लागली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

आंदोलनास आम आदमी पक्षाचे दिल्लीचे राज्याचे पर्यावरणमंत्री गोपाळ राय, राज्यसभेचे खासदार संजय सिंग, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग, किसान संघर्ष मजदूर समितीचे गुरूनाम चढोणी यांच्यासह देशातील विविध पक्ष, शेतकरी संघटना, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

युवा वर्ग शेतीपासून अलिप्त होऊ लागला

लॉकडाऊनच्या काळात रोजगार निर्मिती ठप्प होती. जवळपास अडीच कोटी लोक बेरोजगार झाले. मात्र, शेती क्षेत्राने नवीन ४० लाख रोजगारनिर्मिती केली. देशात सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या शेती क्षेत्रात पिकांना किमान आधारभूत किंमत मिळत नसल्याने व केंद्र शाश्वत धोरण नसल्याने युवा वर्ग शेतीपासून अलिप्त होऊ लागला असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीCentral Governmentकेंद्र सरकारUnemploymentबेरोजगारी