शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

शाहूवाडी तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडली

By admin | Published: December 13, 2015 11:04 PM

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त : श्रेणी - २ केंद्रांमध्ये सेवेचा बोजवारा

रामचंद्र पाटील -- बांबवडे--शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. या व्यवसायाने शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा गाडा सुरळीत चालण्यास मदत होते; परंतु या पशुधनासाठी असणारी आरोग्य सुविधाच व्हेंटिलेटरवर असल्याने जनावरांना शाहूवाडी तालुक्यात वालीच उरला नसल्याचे चित्र आहे.शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेची १२ पशुवैद्यकीय केंद्रे आहेत. तर बांबवडे येथे महाराष्ट्र शासनाचे एक पशुवैद्यकीय केंद्र आहे. तालुक्यात श्रेणी-१ ची मलकापूर, विरळे, शित्तूर-वारुण, रेठरे, आंबा, मांजरे, सोनुर्ले, परळे निनाई या ठिकाणी केंद्रे आहेत.श्रेणी-१ केंद्रांमध्ये पशुधन विकास अधिकाऱ्यांची सर्व पदे रिक्त आहेत. या केंद्रात पशुधन पर्यवेक्षक व परिचर यांचीही संख्या कमी आहे. या केंद्रात सर्व सुविधा असूनही अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे. काही केंद्रे ही परिचरावरच अवलंबून असून, त्यांना काम करण्यासही मर्यादा आहेतच.श्रेणी-२ केंद्राची अवस्था थोडी बरी आहे. या केंद्रांमध्ये सर्व पदे भरलेली आहेत; परंतु केंद्रामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे ‘जेथे चणे आहेत तेथे दात नाहीत, तर दात आहेत तेथे चणे नाहीत’, अशी या केंद्रांची अवस्था झाली आहे. यामध्ये जनावरांना सुविधा मात्र मिळू शकत नाहीत.महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत २००४/५ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात १७२ दवाखाने मंजूर झाले होते. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्याला सहा मिळाले. त्यापैकीच तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बांबवडे येथे आहे. यासाठी निधी मंजूर आहे. जागा मंजूर आहे; परंतु शासनाच्या उदासीनतेचा फटका बसल्याने दहा वर्षांचा कालावधी होऊनही येथे पशुवैद्यकीय दवाखाना पूर्ण क्षमतेने सुरू नाही.या सर्वांवर कळस म्हणजे या केंद्रात पाच पदे मंजूर असून एकही पद भरलेले नाही. या केंद्रात जनावरांवर उपचार करण्याच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असूनही एकही कर्मचारी येथे उपलब्ध नाही. तात्पुरती व्यवस्था म्हणून मोहरे येथील एक परिचर व पट्टणकोडोली येथील पशुवैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोन दिवस येतात; परंतु त्यांच्यातही नियमितता नसल्याने या केंद्राकडे शेतकऱ्यांनी कायमचीच पाठ फिरविली आहे.पशुसंपदेची गैरसोय टाळावीशासन एम.पी.एस.सी.मार्फत या अधिकाऱ्यांची पदे भरते; परंतु जिल्ह्यात मोठ्या दोन दूध संस्था असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात अधिकारी येण्यासाठी राजी नसतात. यावर शासनाने उपाययोजना करून ही पदे भरून शेतकऱ्यांची पशुसंपदा तरी वाचवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.