शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:24 IST

गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे गावांनी तालुका आणि तालुक्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआराखडे सादर करण्यासाठी ७ जूनपर्यंत मुदत आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिक सजग

कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे गावांनी तालुका आणि तालुक्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत संभाव्य पुराच्या अनुषंगाने आराखडे तयार करून यंत्रणा तैनात केली जाते; पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने सर्व यंत्रणेवर ताण आला. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी इतर नुकसान मोजण्याच्या पलीकडचे होते.  या पार्श्वभूमीवर यंदा अधिक दक्षता बाळगत पूरबाधित गावांना संभाव्य आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आराखड्यांत गावात किती पाऊस होतो, अतिवृष्टी होणारी ठिकाणे, किती लोक पूरबाधित होऊ शकतात, त्यांच्या स्थलांतराची, निवाऱ्याची काय व्यवस्था असणार, आपत्तीचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची साधनसामग्री उपलब्ध आहे, कोणती आवश्यकता आहे, याची विस्तृत माहिती द्यावी लागणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर गावांनी तालुका तहसीलदारांकडे , तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तो सादर करावयाचा आहे.आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्कजिल्हाधिकारी कार्यालयात असलेला आपत्ती व्यवस्थापन कक्ष १ जूनपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. आताही ३५ कर्मचाऱ्यांमार्फत तीन पाळ्यांमध्ये रात्रंदिवस काम चालते; पण १ जूनपासून यात पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, महसूल या यंत्रणांतील आणखी १० जण समाविष्ट करून घेतले जाणार आहे. ४५ जणांसह हा कक्ष ऑक्टोबरपर्यंत अहोरात्र सुरू राहणार आहे.जिल्ह्यातील पूरबाधित गावेशिरोळ ४२, हातकणंगले २३, करवीर ५७, कागल ४१, राधानगरी २२, गगनबावडा १९, पन्हाळा ४७, शाहूवाडी २५, गडहिंग्लज २७, चंदगड ३०, आजरा ३०, भुदरगड २३

गेल्या वर्षासारखाचा पूर यंदाही येईल, असे गृहीत धरून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला लागली आहे. जनजागृती व सज्जता तपासण्यासाठी आपत्तीतील बचावाची प्रात्यक्षिकेही घेतली जात आहेत.प्रसाद संकपाळ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर