शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Kolhapur Politics: विनय कोरे, आवाडे, यड्रावकर यांच्या मंत्रिपदाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:09 IST

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे मिळणार संधी

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार बनवण्यात मोलाचा वाटा उचललेले आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या १५ जागा रिक्त असून २७ जूनला सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. त्यामध्ये यातील किमान एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सध्या महायुतीच्या मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ हे एकमेव मंत्री म्हणून कार्यरत आहेत, तर राजेश क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असून या पदाचा मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी अनुक्रमे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती. केवळ उमेदवारी न देता शिंदे यांनी या दोघांसाठी रात्रीचा दिवस केला होता.

परंतु संजय मंडलिक हे दीड लाखाच्या फरकाने पराभूत झाले आणि धैर्यशील माने हे १४ हजारांवर मतांनी निवडून आले. एकूणच महाराष्ट्रात महायुतीला जोराचा झटका बसल्याने आता विधानसभेसाठीच्या जोडण्यांचा प्रमुख भाग म्हणून नव्याने काही जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे दोनदा विधानसभेवर निवडून आले असले तरी त्यांच्या मतदारसंघात मंडलिक हे तब्बल ६५ हजारांवर मतांनी पिछाडीवर राहिल्याने मंत्रिपदावरील त्यांचा दावा हलका झाल्याचे मानले जाते.याउलट धैर्यशील माने यांना इचलकरंजीतून ३९ हजारांवर, तर शिरोळ मतदारसंघातून तीन हजारांवर मताधिक्य मिळाले आहे. सत्यजित पाटील सरूडकर हे शाहूवाडी या त्यांच्या तालुक्यातून मोठे मताधिक्य घेतील, असे चित्र होते; परंतु कोरे यांनी शाहूवाडीतून मिळू शकणाऱ्या सरूडकरांच्या मताधिक्याला प्रामाणिक काम करत कात्री लावल्याने या तिघांच्याही नावांची आता मंत्रिपदासाठी चर्चा सुरू झाली आहे.

भाजप कोणाला देणार प्राधान्यशिंदेसेनेकडून राजेंद्र पाटील यड्रावकर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत; परंतु भाजपचा एकही आमदार नसल्याने मंत्रिपद द्यायचेच झाल्यास सहयोगी पक्षाचे विनय कोरे किंवा प्रकाश आवाडे यांना संधी दिली जाणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आवाडे यांना मंत्रिपद देण्यापेक्षा त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचे समाधान केले जाऊ शकते. कोरे मात्र मंत्रिपद मिळणार असले तरी तीन महिन्यांसाठी ते हे पद स्वीकारतील का याबाबतही शंका व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणVinay Koreविनय कोरेPrakash Awadeप्रकाश आवाडेministerमंत्री