शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

Kolhapur- विशाळगड जाळपोळ प्रकरण: आंदोलकांनी जातीपातीत तेढ वाढवली हे दुर्दैवी - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 11:41 AM

गजापूरमधील नुकसानग्रस्तांशी साधला संवाद

आंबा : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला आंदोलकांनी हिंसक वळण देऊन जातीपातीमधील तेढ वाढवले हे दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी गुरुवारी दुपारी गजापूरला भेट देऊन नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पवार सुमारे दोन तास या परिसरात होते. त्यांनी बारकाईने अधिकाऱ्यांकडून या सर्व प्रकाराची माहिती घेतली.मंत्री पवार म्हणाले, कोणतीही संघटना असो किंवा पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी समाजामध्ये सलोखा टिकवण्याचे काम करण्याची गरज आहे. आमचे सरकार पहिल्या दिवसापासून येथील घटनेवर लक्ष ठेवून आहे. बारकाईने येथील घटनेची खात्री करण्यास आलो. बांधवांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. निष्पाप व्यक्तींना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई करू. आपदग्रस्तांना नियमानुसार भरपाई दिली जाईल.पवार यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे प्रशासन यंत्रणा दुपारी सज्ज होती. कोल्हापूरहून येण्याऐवजी सांगली जिल्ह्यातून गजापूरला आले. प्रार्थनास्थळासह तोडफोड केलेल्या घरांची व वाहनांची त्यांनी पाहणी करून कुटुंबातील सदस्यांच्या वेदना समजून घेतल्या. यावेळी त्यांनी व्यावसायिक अतिक्रमणे प्राधान्याने काढली जातील. तिथे कोणताही भेदभाव होणार नाही असे स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशाबाहेर जाऊन कोणताच निर्णय होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी आमदार राजेश पाटील, सर्जेराव पाटील पेरीडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे त्यांच्यासोबत होते.

संभाजीराजे थांबले असते तर ..पत्रकारांशी बोलताना मंत्री पवार म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासाठी संभाजीराजेंनी धरलेल्या आग्रहाबाबत चर्चा करण्यास सरकार सकारात्मक होते. जिल्हा प्रशासन त्यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. दोन दिवसांनी चर्चेतून उत्तम मार्ग काढण्याची तयारी शासनाने दर्शवली होती. दोन दिवस ते थांबले असते तर आंदोलनाला हिंसक वळण लागले नसते. कोणताही जमाव एकदा आक्रमक झाला की कुणाचे कोण ऐकत नाही. हेच इथे घडले आहे. याआधीही अनेकदा असे अनुभव आले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार