शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीमार्फत रविवारी विवेक चेतना संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:49 AM

कोल्हापूर : विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या महाराष्ट्र प्रांत शाखेमार्फत रविवार, दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी विवेक चेतना २०२१, वेध ...

कोल्हापूर : विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या महाराष्ट्र प्रांत शाखेमार्फत रविवार, दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी विवेक चेतना २०२१, वेध युवा मनांचा, ध्यास आत्मनिर्भरतेचा, साद युवाशक्तीला या उपक्रमात डॉ. समीर पारेख यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधण्यात येणार आहे.

या उपक्रमातील ‘जीवनकौशल्ये-संवाद आणि सहानुभूती’ या विषयावरील पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात निर्माण उत्तम चारित्र्याचे या विषयांतर्गत डॉ. समीर पारेख हे रविवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळेत होणाऱ्या परिसंवादात संवाद साधणार आहेत. डॉ. पारेख हे सीए आहेत.

१८ ते ४० वयोगटातील युवकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास आणि त्यांच्यातील क्षमता काैशल्याचे वर्धन व्याख्यान आणि परिसंवादाच्या माध्यमातून हा नि:शुल्क उपक्रम सुरू आहे. डिसेंबरअखेर सुरू राहणाऱ्या या दुसऱ्या टप्प्यात या विवेक चेतना उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवीन सदस्यांसाठी नावनोंदणी सुरू आहे. यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना सकाळी ९.४५ वाजता ऑनलाईन लिंक उपलब्ध होईल, अशी माहिती कोल्हापूर केंद्राचे अरुण कुलकर्णी यांनी दिली आहे. यासाठी १०१६, ए वॉर्ड, औक्षण, भोईटेनगर, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

(संदीप आडनाईक)