शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

नेत्यांच्या राबणुकीला मतदारांनी दिला न्याय

By admin | Published: February 24, 2017 12:41 AM

सर्वच पक्षांना जल्लोषाची संधी : भाजप, शिवसेना नेत्यांचे नियोजन ठरले यशस्वी

कोल्हापूर : सर्व पक्षांच्या नेत्यांच्या राबणुकीला मतदारांनी न्याय दिल्याचे प्रातिनिधिक चित्र जिल्हा परिषदेच्या निकालानंतर समोर आले आहे. त्यातही शिवसेना आणि भाजपने जाणीवपूर्वक केलेले नियोजन यशस्वी झाल्याचे एकूण विजयी सदस्यांची संख्या पाहता दिसून येते. गेल्यावेळी ३० सदस्यांच्या बळावर जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’ला सोबत घेऊन सत्ता संसार करणाऱ्या काँग्रेसच्या विजयासाठी यावेळीही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत ठरले आहे. पी. एन. यांच्या चिरंजीवाचा विवाह याचदरम्यान आल्याने त्यांना जिल्हाभर फिरता आले नाही. त्यामुळे त्यांनी नंतर ‘करवीर’वर लक्ष केंद्रित केले. मात्र, सतेज पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात फिरून उमेदवारी देण्यापासून ते प्रचारसभा घेण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडली. मात्र, काँग्रेसचे दोन नेते जयवंतराव आवळे आणि प्रकाश आवाडे यांच्यातील वाद मिटवता आला नाही. काँग्रेसचे बहुतांशी उमेदवार या दोघांना मानणारे आहेत.राष्ट्रवादीच्या निवडणुकीची धुरा प्रामुख्याने आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यावर होती. माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी काही ठिकाणी भाजपच्या ‘सोयीची भूमिका’ घेतली असतानाही आणि प्रतिकूल वातावरण जाणवत होते. मात्र, टप्प्या-टप्प्याने अनेकजण राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानेही मुश्रीफ हे जिल्हाभर काम करू शकले नाहीत हे वास्तव आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच अडकून पडावे लागले. महसूलमंत्री भाजपचे चंद्रकांतदादा पाटील यांनी जनसुराज्य आणि ताराराणी आघाडीला सोबत घेत चांगली आखणी केली होती. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, आमदार अमल महाडिक, संघटनमंत्री बाबा देसाई यांच्यावर ‘दादां’नी जबाबदारी टाकून ते सांगली आणि साताऱ्याच्या प्रचारासाठीही फिरत होते. ‘भाजता’ची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, नंतर अनेक जागांवर पर्याय नसल्याने भाजपला मिळतील ते उमेदवार उभे करावे लागले तरीही भाजपने काँग्रेसच्या बरोबरीने जागा मिळविल्या. भाजपच्या सामूहिक प्रयत्नांचेच हे यश आहे. मावळत्या सभागृहात भाजपचे ३ उमेदवार होते. तेथून १४ पर्यंतची भाजपने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. दुसरीकडे शिवसेनेला फारसे कुणी गांभीर्याने घेत नसल्याचे प्रारंभी चित्र होते. मात्र, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव यांनी अतिशय शांतपणे, फारसा गाजावाजा न करता नियोजन केले होते. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, संजय मंडलिक, संजय घाटगे यांच्या प्रयत्नांना यश येत शिवसेना सहा जागांवरून या सभागृहात दहा जागांवर पोहोचली. मुंबई महापालिकेच्या संघर्षामुळे शिवसेना आणि भाजप हे समीकरण आधी जमले नाही. मात्र, अशी युती झाली असती तर या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असते.काँग्रेसतर्फे सतेज पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात फिरून प्रचाराची धुरा सांभाळली राष्ट्रवादीच्या निवडणुकीची धुरा प्रामुख्याने आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्यावर होती.चंद्रकांतदादा पाटील यांनी जनसुराज्य आणि ताराराणी आघाडीला सोबत घेत चांगली आखणी केली होती. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव यांनी अतिशय शांतपणे, फारसा गाजावाजा न करता नियोजन केले होते.