शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:30 AM

संदीप बावचे : शिरोळ : अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला महापूर अनेक प्रश्न व आव्हाने घेऊन आलेला आहे. असा प्रत्येक ...

संदीप बावचे :

शिरोळ : अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला महापूर अनेक प्रश्न व आव्हाने घेऊन आलेला आहे. असा प्रत्येक वर्षाला महापूर येणार असेल, तर आम्ही शेती पिकवायची की नाही, असा प्रश्न शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. यंदा महापुरामुळे वीस हजार हेक्टर क्षेत्रातील तीस कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापुरामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक पध्दतीत बदल करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे.

२०१९ च्या महापुरानंतर सावरत असतानाच पुन्हा एकदा कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दूधगंगा या नद्यांच्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यात हाहाकार माजला. बघता-बघता ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, फूलशेती, केळी यासह अन्य पिके पाण्याखाली गेली. तीन दिवसांच्या अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झालं.

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारा शेतकरी महापुरामुळे खचला आहे. उभी पिके पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. पूर ओसरल्यानंतर पिकांचा पालापाचोळा दिसत आहे. कुजलेली पिके शेतातून बाहेर काढली जात आहेत. शेतीचे भकास चित्र दिसू लागले आहे. कुजलेल्या पिकांची विल्हेवाट लावणे हे एक आव्हानच ठरत आहे. ज्या जमिनीवर सतत आठ-दहा दिवस पाणी साचून राहिले, त्या जमिनीतील जिवाणू मरून गेले आहेत. त्याचे पुन्हा संवर्धन करणे शिवाय पीकवाढीवर होणारे परिणाम देखील शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहेत. पिकामध्ये केलेली गुंतवणूक वाया गेली आहे. शेतकरी पुन्हा उभा राहण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी संघर्ष समित्यांचा एल्गार सुरू आहे. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी अनेक आश्वासने सरकारने दिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा लागून राहिली आहे.

फोटो - १३०८२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ -

शिरोळ-शिरटी मार्गावरील महापुराने खराब झालेले सोयाबीन पीक शेतकरी कापून टाकत आहेत. (छाया - सुभाष गुरव, शिरोळ)