शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

निरोगी जोडीदार आणि एकत्र कुटुंब हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:53 AM

कोल्हापूर : कोरोनानंतर उपवर वधू-वरांच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे. मुलगा आयटीतलाच हवा, मुलगी गोरीपानच हवी, सुंदर असावी, कमावणारी ...

कोल्हापूर : कोरोनानंतर उपवर वधू-वरांच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे. मुलगा आयटीतलाच हवा, मुलगी गोरीपानच हवी, सुंदर असावी, कमावणारी असावी, मुलाला लाखाचे पॅकेज हवे, सासू-सासऱ्यांचा त्रास नको, एकत्र कुटुंब नको, अशा अटी-शर्तींवर लग्न करण्याची मानसिकता आता राहिली नाही. एकत्र कुटुंब पद्धती, पैशांपेक्षा निरोगी आयुष्य याचे महत्त्व पटल्याने आता अपेक्षांमध्येही बदल झाला आहे.

दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या कोरोनाने माणसाच्या जगण्याच्या संकल्पनाच बदलल्या. गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले. कोरोनाचा शिरकाव झालेल्या कुटुंबांना एकटेपणात जगावे लागले. एखाद्याचा मृत्यू झाला तर खांदा द्यायलाही कोणी नसते, याची जाणीव झाली. निरोगी आणि आरोग्यदायी जीवनाचे महत्त्व नव्याने कळले. या महामारीने पैशांपेक्षा नातेसंबंधांचे महत्त्व आणि गरजही कळले. सगळ्याच क्षेत्रावर या आजाराचे जसे चांगले वाईट परिणाम झाले तसेच परिणाम उपवर वधू-वरांच्या अपेक्षांवरही झाले.

एरवी मला अमूक पगारात, विशिष्ट शहरात राहणारा, आई-वडील जवळ राहत नसलेला नवरा हवा अशी अपेक्षा असलेल्या मुलींना आता निरोगी-कोणतेही आजार नसलेला, आरोग्यदायी जीवनशैली असलेला, जरा कमी पगाराचा आणि शक्यतो आपल्याच शहरात किंवा फार तर शेजारच्या जिल्ह्यात राहणारा नवरा हवा आहे. संकटकाळात नोकरी-व्यवसायात अडचणी आल्या तर सारवणारी माणसं असावीत म्हणून एकत्र कुटुंबही चालेल, असे मुलींचे व पालकांचेही म्हणणे आहे.

मुलांनाही मुलगी देखणी, गोरीपान, उच्चशिक्षित हवी, नोकरी करणारी हवा अशा वेगवेगळ्या अपेक्षा होत्या, आता त्यांनाही मुरड घालत कुटुंब व्यवस्था सांभाळणारी, एकत्र कुटुंबात राहणारी आणि जरा कमी शिकलेली किंवा कमी पगाराची नोकरी असलेली मुलगीही चालेल, अशी अपेक्षा आहे.

--

या अपेक्षांची पडली भर

-निरोगी, आरोग्यदाजी जीवनशैली

-ऑनलाईन क्षेत्रातील नोकरी

-आपल्याच शहरातील किंवा कमी अंतर असलेल्या जिल्ह्यातील स्थळ

-कमी पगार असला तरी चालेल, पण चांगला स्वभाव

-आई-वडील, एकत्र कुटुंब असले तरी चालेल

-मुलगीही कमावती हवी.

----

या अपेक्षा झाल्या कमी

- लग्न धुमधडाक्यात व्हावे

-अमूक शहरातच राहणारा मुलगा-मुलगी हवी

-गलेलठ्ठ पगार

-शाश्वत नोकरी किंवा व्यवसाय

-मुलगा एकुलता एक हवा

-आई-वडील जवळ नको

----

कोरोना, लॉकडाऊनने निरोगी आयुष्य, एकत्र कुटुंब आणि पैशांपेक्षा नात्यांना आणि सुखी जीवनाला अधिक महत्त्व असल्याची जाणीव झाली आहे. त्याचा परिणाम वधू-वरांच्या अपेक्षांवरही झाला आहे. डामडौल, दिखावा न करता कमी पैशात लग्न होतात हे कळलं. म्हणूनच या काळात विवाहांचे प्रमाणही वाढले.

-श्रीकांत लिमये, पंचरत्न वधू-वर सूचक केंद्र

---