शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

जलजागृती ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:20 AM

गडहिंग्लज : दिवसेंदिवस भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे भूजल साठ्याच्या नियोजनाबरोबरच जलजागृती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ...

गडहिंग्लज : दिवसेंदिवस भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे भूजल साठ्याच्या नियोजनाबरोबरच जलजागृती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले.

जिल्हा परिषद आणि भूजल सर्वेक्षण-विकास यंत्रणा विभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित भूजल साक्षरता आणि जलजागृती याविषयावरील वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मगर म्हणाले, ग्रामीण भागातील पाण्याचे पारंपरिक स्त्रोत आणि जलसाठे यांची जपणूक व संवर्धन करण्याची गरज आहे. लोकसहभागातूनच हे काम शक्य आहे.

उपअभियंता उत्तम थोरात यांनी ‘भूजल पुनर्भरण’ या विषयावर, अणुजैविक तज्ज्ञ कृष्णमूर्ती सूर्यवंशी यांनी ‘पाणी गुणवत्ता व तपासणी’ तर पाणी गुणवत्ता सल्लागार बसवराज वाडेकर यांनी ‘पाणी शुद्धीकरण’ याविषयावर मार्गदर्शन केले.

चर्चासत्रात गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

उपलेखापाल किशोर कदम यांनी स्वागत केले. ऋषिराज गोसकी यांनी आभार मानले.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील चर्चासत्रात गटविकास अधिकारी शरद मगर यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : १६०७२०२१-गड-०५