शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

हलगर्जीपणामुळे नागरिकांना दूषित पाणी

By admin | Published: October 05, 2015 12:43 AM

चंदगड पंचायत सभा : प्रशासनावर आरोप; वनविभाग धारेवर; हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी

चंदगड : प्रशासनाच्या जबाबदारी झटकून टाकण्याच्या वृत्तीमुळे चंदगडसह तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून संबंधित विभागांनी समन्वयाने हा प्रश्न सोडवून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे खडेबोल रविवारी झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत संबंधित विभागांना सुनावण्यात आले. सभापती ज्योती पवार-पाटील अध्यक्षस्थानी होत्या.गटविकास अधिकारी एस. डी. डवरी यांनी स्वागत केले. विषयपत्रिकेनुसार विस्तार अधिकारी गजगेश्वर यांनी तालुका आरोग्य विभागाचा अहवाल सादर केला. यावेळी चंदगडसह तालुक्यातील अनेक गावांचे पाणी दूषित असताना केवळ कागदोपत्री शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचे दाखवले जाते, असा गंभीर आरोप सदस्य अनिल सुरूतकर व उपसभापती शांताराम पाटील यांनी करत संबंधित विभागाला धारेवर धरले. त्यावर गजगेश्वर यांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य विभागाची नसून ग्रामपंचायत व नळपाणीपुरवठा विभागही त्यासाठी जबाबदार असल्याचे सांगितले. त्यावर पाणीपुरवठा व ग्रामपंचायत विभागाने एकमेकांकडे बोट दाखवून दूषित पाणीपुरवठा होण्यास आपला विभाग जबाबदार नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर संबंधित विभागांनी समन्वयाने हा प्रश्न हाताळून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे सुनावण्यात आले. वनविभागाचा अहवाल बावरा यांनी सादर केला. यावेळी पावसाअभावी शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच जांबरे-उमगाव परिसरात हत्तींकडून मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकांचे नुकसान केले जात आहे. वारंवार हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी करून वनविभाग तसेच शासनाकडून ठोस उपाययोजना राबवली जात नाही. त्यामुळे लोकांच्या उद्रेकाची वाट शासन पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित करून कोणतीही कारणे न सांगता तातडीने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शांताराम पाटील यांनी केली.प्र. शाखा अभियंता ए. एस. सावळगी यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी तालुक्यातील सहा मंडळांत पडलेल्या पावसावरून तालुक्यात झालेल्या सरासरी पावसाची आकडेवारी सादर केली. त्यावर सुरूतकर यांनी आक्षेत घेत तालुक्यातील अनेक भागात पाऊसच झालेला नाही; परंतु सरासरी आकडेवारीवरून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे दिसते; परंतु हे चुकीचे आहे. शासनाला विभागवार आकडेवारी कळवावी आणि दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. ग्रामीण आरोग्य विभागाचा अहवाल डॉ. साने यांनी सादर केला. यावेळी शांताराम पाटील यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी कुत्र्यांकडून चावा घेण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, आरोग्य विभागाकडे त्यावर देण्यात येणारी ‘रेबीज’ लस उपलब्ध नसल्याने तसेच चंदगड तालुका जिल्ह्यापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे याची नोंद घेऊन कोणतीही कारणे न सांगता रेबीज लस तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करावी, अशी सूचना केली. एनआरएचएचचा काही निधीही लस खरेदीसाठी वापरावा, असे गटविकास अधिकारी डवरी यांनी सांगितले. सदस्या तुळसा तरवाळ यांनी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तेथील कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळत नसल्याचे सांगितले. जांबरे धरणातील पाणी सोडू नयेयंदा सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती आहे. चंदगड तालुकाही त्याला अपवाद नाही. तालुक्यातील धरणातील पाणीसाठा पाहता मार्च-एप्रिलमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे ताम्रपर्णी नदीतील पाणीसाठा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या सहमतीने जांबरे धरणातील पाणी ताम्रपर्णी नदीत सोडावे. धरणाच्या दुरुस्तीचे काम पुढे करून धरणात साठवलेले पाणी आताच सोडू नये, अशी मागणी शांताराम पाटील यांनी केली.