शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
2
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
3
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
4
Gold Silver Price Rate Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह गोल्ड रेट
5
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
6
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
7
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
8
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
9
तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले
10
IND vs BAN 1st T20 : हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध
11
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
12
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
13
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
14
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
15
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
16
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
17
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
18
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
19
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
20
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले

विंझणे, मोरेवाडी, सत्तेवाडीत पाण्याची टंचाई

By admin | Published: April 13, 2016 9:22 PM

पाच दिवसांतून पाणी : नळयोजना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विजयकुमार कांबळे--अडकूर (ता. चंदगड) परिसरातील विंझणे, मोरेवाडी, सत्तेवाडी या गावांत गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पाण्याने तहानलेली माणसे रानोमाळ भटकंती करत वणवण फिरत आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने शेतकऱ्यांनी आपली दुधाळ जनावरेही कवडीमोल दराने विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावा-गावांतील दूध संस्थांचे संकलनही कमी झाल्याने दूध संस्थाही बंद पडण्याची वेळ आली आहे.विंझणे : अडकूरपासून २ कि.मी. अंतरावर डोंगराच्या कपारीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले विंझणे हे गाव. गावची लोकसंख्या जेमतेम १२००. या गावाला इनामदारांचे गाव म्हणूनच ओळखले जात होते. येथील १९२७ मध्ये बांधलेला ‘राम-निवास’ हा इनामदारांचा वाडा याने गावच्या वैभवात भर पडली आहे, परंतु याच गावाला पिण्याच्या पाणीटंचाईने ग्रासले आहे. गत तीन महिन्यांपासून ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड देत आहेत. गावातील जुनी नळपाणी योजना आहे, परंतु त्या विहिरीला पुरेसे पाणी मिळत नाही. म्हणून नव्यानेच घटप्रभा नदीवरून जॅकवेल बांधून ३ कि.मी. अंतरावरून ९५ लाखांची योजना राबविली आहे. परंतु, ठेकेदार आणि वीजमंडळाच्या गलथान कारभारामुळे योजना रखडली आहे. मोरेवाडी : विंझणे गावापासून जवळच असलेलं डोंगराच्या मध्यभागी वसलेलं मोरेवाडी हे गाव. प्रतिवर्षी शासकीय पातळीवरील लाखो रुपयांच्या पाणी योजना राबविल्या जातात, परंतु वर्षाच्या आत कोलमडतात, अशी स्थिती या गावाची आहे. नदीवरून जॅकवेल बांधून गावात पाणी आणावे अशी सूचना शासकीय अधिकारी आणि राजकीय नेतेमंडळींनी मोरेवाडीच्या गावपुढाऱ्यांना केली. मात्र, १५ टक्के निधी म्हणजेच लोकवर्गणी भरायची कुणी? शिवाय नदीवरून आणलेल्या मोटारीचे बिल कसे भरायचे? या अनेक प्रश्नांमुळे मंजूर झालेली जलस्वराज्य योजनाच ग्रामस्थांनी रद्द केली.गावातील पाच तलावाजवळ खुदाई केलेल्या बोअरवेलला मुबलक पाणी लागले आहे, परंतु ते पाणी दूषित आहे. त्या पाण्याने अंघोळ केली तर केस चिकटतात. जनावरे तर ते पीतच नाहीत. सध्या येथील पाटील यांच्या मालकीच्या बोअरवेलचे पाणी अधिग्रहण केले आहे. हे पाणी गावच्या टाकीत सोडून २ दिवसांतून एकदा ग्रामस्थांना मिळते, तर प्रत्येकाला सहा घागर पाणी मोजून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या शिपायावर आली आहे.सत्तेवाडी: शिरोली पैकी सत्तेवाडी या गावातही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. शिरोलीच्या डोंगराकडून येणारे सायफनचे पाणी झरा कमी झाल्याने भीषण टंचाई जाणवू लागली आहे. घागरभर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी महिलांसह पुरुषांना व लहान बालकांना शेती शिवारातून पायपीट करावी लागत आहे. घटप्रभा नदीवरून आणलेली नळपाणी योजना पूर्ण केली आहे. मात्र, वीजखात्याच्या काही तांत्रिक कारणामुळे ही योजना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जि. प.चे अडकूर विभागाचे सदस्य तात्यासाहेब देसाई यांच्या शेतातील बोअरवेलचे पाणी आता ग्रामस्थांची तहान भागवत आहे. रखडलेल्या पाणी योजना लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.