शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

पाणीपुरवठा, पाईप खरेदीवरून खडाजंगी

By admin | Published: January 03, 2017 1:17 AM

इचलकरंजीच्या नगरपालिका सभेत गदारोळ : दोन्ही विषय मंजूर; नगररचनाकारांवरील तक्रारींवर सवाल

इचलकरंजी : वारणा पाणीपुरवठा योजना कामासाठीची १९.९९ टक्के कमी दराची आर. एस. घुले यांची निविदा आणि डीआय पाईप्सची खरेदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणऐवजी नगरपरिषदेमार्फत पुरविणे, या दोन्ही विषयांवर इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या पहिल्या सभेत खडाजंगी झाली. त्यानंतर हे दोन्ही महत्त्वाचे विषय मंजूर करण्यात आले. नगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या. सभेमध्ये वारणा पाणीपुरवठा व पाईप पुरविणे हे दोन विषय होते. यामध्ये वारणा योजनेच्या २४.२८ कोटी रुपये कामासाठी मागविलेल्या निविदांपैकी सर्वांत कमी म्हणजे १९.९९ टक्के कमी दराची निविदा मंजूर करणे तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक डीआय पाईपचा पुरवठा नगरपरिषदेमार्फत करणे, हे विषय मंजूर करण्यात आले.निवडणुकीनंतर नगरपरिषदेची ही पहिलीच सभा होती. प्रारंभी मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी सर्व नूतन सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्यासह सर्वच सदस्यांनी सभागृहाला आपली ओळख करून दिली, तर विरोधी काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, राजर्षी शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी प्रत्येक विकासकामात सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.सभेला सुरुवात होताच शाहू आघाडीचे नगरसेवक उदयसिंह पाटील यांनी नगररचनाकार सभागृहात हजर नसल्याचे निदर्शनास आणून ते महत्त्वाच्या बैठकीवेळी गैरहजर असतात, त्यांच्याबद्दल नागरिकांच्याही तक्रारी असल्याचा प्रश्न उपस्थित केला; पण त्यावर कार्यालयाकडून मात्र कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाही. वारणा पाणी योजनेसंबंधीच्या विषयावर बोलताना नगरसेवक शशांक बावचकर यांनी पालघरच्या आर. ए. घुले यांनी यापूर्वी केलेल्या कामाची तपासणी केली आहे काय, योजनेसाठी वारणा धरणातून पाण्याचे आरक्षण केले आहे का, तसेच दानोळी (ता. शिरोळ) येथे योजनेसाठी आवश्यक इंटकवेलसाठी जागा खरेदी केली आहे का, असे सवाल उपस्थित केले. त्यावर मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सभागृहाला माहिती देताना पाटबंधारे विभागाची नगरपालिकेकडून १७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती माफ होण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी केली आहे. परंतु, त्यांनी त्यास नकार दर्शविला असून, एक कोटी रुपये जमा केल्यास पाण्याचे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगितले. त्यानुसार पालिकेने पाटबंधारे विभागाकडे ८५ लाख रुपये जमा केले असून, मार्चअखेर ३५ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. हे काम शासनाच्या आदेशानुसार सुरू असल्याचे सांगितले. या दोन्ही विषयांवर दोन्ही गटांच्या प्रमुख सदस्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडले. अखेर दोन्ही बाजंूच्या संमतीने मंजुरी देण्यात आली. (वार्ताहर)