शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

कळंब्यासह उपनगरांवर पाणीसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:53 PM

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भविष्यात उपनगरवासीयांसह कळंबा ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळंबा तलावाची पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव भरून सांडव्यावरून वाहतो. सध्या पाणीपातळी २० फुटांपेक्षा खाली स्थिरावली आहे. यातील जलचरांच्या अस्तित्वासाठी सात फूट पाणीसाठा कायम ठेवावा लागतो. तलावातून ...

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भविष्यात उपनगरवासीयांसह कळंबा ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळंबा तलावाची पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव भरून सांडव्यावरून वाहतो. सध्या पाणीपातळी २० फुटांपेक्षा खाली स्थिरावली आहे. यातील जलचरांच्या अस्तित्वासाठी सात फूट पाणीसाठा कायम ठेवावा लागतो. तलावातून पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्यांच्या गळत्या काढण्यासाठी पालिकेने पाणी उपश्यावर बंदी आणली आहे. महिन्याभरात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची भीषणता जाणवणार हे मात्र निश्चित.जुलै महिन्यात आठवडाभर पाऊस चांगला झाला. त्यामुळे तलावात पाणीसाठा वेगाने वाढला. मात्र त्यानंतर पावसाने चांगलीच उसंत घेतली. आता पुरेसा पाऊस न झाल्यास पुढील वर्षी पाणी मिळणार की नाही, अशी चिंता निर्माण झाली आहे.कळंबा तलावातून कळंबा ग्रामपंचायत १४ एचपी मोटारीद्वारे रोज दहा तास पाणी उपसा करते. उपनगरांसाठी तलावातून कळंबा फिल्टर हाऊसमध्ये चोवीस तास पाणी उपसा होतो. पुढे हे पाणी बी वॉर्ड, मंगळवार पेठेत वितरित होते. यातील पाणी सुभाषनगर पंपिंग स्टेशनमध्ये सोडून आर. के. नगर, मोरेवाडी, सुभाषनगर, वर्षानगरास वितरित होते.गतवर्षी जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून तलावातील प्रचंड गाळाचा उपसा करण्यात आला. यंदाही मागेल त्याला गाळ योजनेंतर्गत गाळ उपसा करण्यास परवानगी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ उपसा होऊन पाणीसाठा क्षमता वाढली. गतवर्षी अवघ्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने तलाव पूर्ण क्षमतेने भरला; पण तलावातून कळंबा फिल्टर हाऊसकडे जाणाºया माळवाडी व कात्यायनी कॉम्पलेक्स येथील जलवाहिन्यांच्या गळत्या न काढल्याने मार्चमध्ये पाणीपातळी सात फुटांवर आली. परिणामी, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी उपसा करून कळंबा उपनगराची तहान भागविण्यात आली.सध्या महापालिकेने गळत्यांचा प्रश्न निकाली निघेपर्यंत पाणी उपशावर बंदी आणली आहे. त्यामुळे ‘पाणी उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास नवीन वर्षाच्या सुरुवातीसच पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या तलावात अवघा सत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढे पाऊस न पडल्यास पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकावे लागणार अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.तलावाचे भवितव्य प्रशासनाच्या हातीकळंबा गाव पाण्यासाठी पूर्णत: पालिकेवर अवलंबून आहे. ग्रामस्थ पालिका मालकीच्या कळंबा तलावाचे अथवा पुईखडीचे पाणी वापरतात. पण तलाव प्रदूषित होऊ नये, याची काळजी कोणी घेत नाही. तलावाचा वापर जनावरे धुणे, आंघोळीसाठी होतोय. पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामांनी तलावाचा श्वास गुदमरतोय. आज तलावाचे भवितव्य ग्रामपंचायत व पालिका प्रशासनाच्या हाती आहे.