शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
2
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
3
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
4
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
5
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
6
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
7
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
8
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
9
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
10
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
11
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट
12
ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?
13
आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 
14
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
15
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
16
पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी
17
भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला
18
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
19
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
20
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार

आम्ही कोर्टात गेलो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:29 AM

उत्तूर : आम्ही न्यायालयात गेलो ते आंबेओहोळ प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पाचे काम थांबवण्यासाठी नाही. आता प्रकल्पात पाणी तुंबले, आता पुनर्वसनाचे ...

उत्तूर :

आम्ही न्यायालयात गेलो ते आंबेओहोळ प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पाचे काम थांबवण्यासाठी नाही. आता प्रकल्पात पाणी तुंबले, आता पुनर्वसनाचे काय, असा सवाल करीत आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी आंबेओहोळच्या श्रेयवादाची लढाई आणि वस्तुस्थिती यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली.

२४ एप्रिल २०१७ ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या घडामोडींचा पत्रकार परिषदेत लेखाजोखा मांडण्यात आला.

यामध्ये १०० टक्के पुनर्वसन एकाही धरणग्रस्ताचे झालेले नाही. अर्धवट पुनर्वसन ३० धरणग्रस्तांचे झाले. ५६ प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. १५ भूमीहीनांना कोणताही मोबदला दिला नाही.

४६० स्वेच्छा पुनर्वसन खातेदारांपैकी ३७३ जणांचे स्वेच्छा पुनर्वसन झाले. ३० टक्के लोकांचे पेमेंट उचल झालेली नाही. संकलन दुरुस्तीसाठी तारीख पे तारीख दिली जाते. मात्र, संकलन दुरुस्ती झाली नाही. २८१ धरणग्रस्तांना १४१ प्लॉट लिंगनूर-कडगाव येथे उपलब्ध आहेत, त्याचेही वाटप झाले नाही. १०० टक्के पुनर्वसन कायदा डावलून प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला आहे. घळभरणी करून पाणीसाठा करणार, असे प्रकल्पग्रस्तांना सांगायला हवे होते. तसे सांगितले नाही. घळभरणीस परवानगी कुणी दिली याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

प्रकल्पात पाणीसाठा सुरू झाल्याने श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मात्र, पुनर्वसनाचे तीन-तेराच झाले आहे. पाणीसाठा करणार हे धरणग्रस्तांना सांगणे गरजेचे होते. आज उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. याला जबाबदार कोण, अशी विचारणा करण्यात आली आहे.

आंबेओहोळ धरणातील जलाशयाचे नाव रामकृष्ण जलाशय असे काही मंडळींनी ठेवून ग्रामविकासमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. हे धरणग्रस्त आहेत का याची विचारणा करून आम्ही ‘अश्रुसागर जलाशय’ असे नामकरण करू, असा इशारा देऊन प्रकल्पस्थळावर फलकही लावण्यात आला.

पत्रकार परिषदेला सदानंद व्हनबट्टे, महादेव खाडे, सरपंच संतोष बेलवाडे, राजा देशपांडे, सचिन पावले आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे ‘अश्रुसागर जलाशय’ असा फलक लावताना धरणग्रस्त.

क्रमांक : ०५०७२०२१-गड-०९