शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
6
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
7
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
8
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
9
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
10
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
11
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
12
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
13
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
14
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
15
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
16
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
17
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
18
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
19
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
20
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video

सर्वांना न्याय देणारे तुमच्या मनातील सरकार राज्यात आणू, राहुल गांधींसमोर सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

By भीमगोंड देसाई | Published: October 05, 2024 2:23 PM

कोल्हापूर : कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून आणि मणिपूर ते मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढून महिला, युवक, शेतकऱ्यांना ...

कोल्हापूर : कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून आणि मणिपूर ते मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढून महिला, युवक, शेतकऱ्यांना आधार देणारे काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या मनातील, न्याय विचाराचे सरकार महाराष्ट्रात आणू, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या उदघाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमातील प्रास्ताविकात त्यांनी खासदार गांधी यांना हे आश्वासन त्यांच्या उपस्थितीतच दिले. यावेळी गांधी यांनीही हसून त्यांना दाद दिली.आमदार पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. या वर्षातच कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होते हे विशेष आहे. कसबा बावडा ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. या भूमीत अठारा पगड जातींच्या कल्याणासाठी उत्तुंग कामगिरी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण न्याय, समता, निर्भयतेसाठी लढणारे राहूल गांधी यांच्या हस्ते होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो, न्याय यात्रेच्या माध्यमातून भयभयीत झालेल्या घटकाला आधार दिला. त्यांच्या मनातील सर्वांना न्याय देणाऱ्या विचाराचे सरकार राज्यात आणू.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याकाळात अन्यायाविरोधात आवाज उठवला. सर्वांना बरोबर घेवून धर्मनिरपेक्षतेची विचारधारा रूजवली. पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा सातत्याने मिळत राहील.विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कसबा बावड्यात, कोल्हापुरात दिवाळी साजरी होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांचे भाषण झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलRahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी