शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

वाघजाई डोंगरावरील स्थानिकांच्या जमिनी बळकावणाऱ्यांना धडा शिकवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:21 AM

कोपार्डे : करवीर व पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरावर दोन्ही तालुक्यातील १२ गावातील शेतकऱ्यांना छत्रपती शाहू महाराजांनी जमिनी दिल्या होत्या. ...

कोपार्डे : करवीर व पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरावर दोन्ही तालुक्यातील १२ गावातील शेतकऱ्यांना छत्रपती शाहू महाराजांनी जमिनी दिल्या होत्या. पण प्रकल्पग्रस्तांच्या अडून त्या हडप करण्यास धनदांडग्या व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी सपाटा लावला आहे. शेतकऱ्यांची कूळवहिवाट असूनही राजकीय व प्रशासकीय वजन वापरून या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याने त्याविरोधात आता तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच शिवाजी कांबळे यांनी दिला.

भामटे, ता. करवीर येथे ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरपंच कांबळे म्हणाले, १९७३ ला वाघजाई डोंगरावर प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यात आली होती. पण या जमिनी प्रकल्पग्रस्तांनी सर्व क्षेत्र कोरडवाहू व येथे वीज, पाणी, रस्त्याच्या गैरसोयी असल्याने नाकारल्या होत्या. यामुळे त्यांना इतर ठिकाणी पुनर्वसन करून जमिनी दिल्या आहेत. पण त्यावेळी शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या नावे काढण्यात आलेला आदेश तसाच राहून गेल्याने या प्रकल्पग्रस्तांच्या नावे वाघजाई डोंगरावरील जमिनी तशाच राहिल्या आहेत. अशा प्रकल्पग्रस्तांना गाठून त्या जमिनी पैशाचे आमिष दाखवून खरेदी करण्याचा सपाटा प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. सरकारी हक्कातील व शेतकऱ्यांच्या कूळवहिवाट असणाऱ्या जमिनी खरेदी करून शेतकऱ्यांना भूमिहीन केले जात आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी उपसरपंच भगवान देसाई म्हणाले. प्रकल्पग्रस्तांनी त्यावेळी कब्जा घेणे आवश्यक होते पण गेली ४० वर्षे त्यांनी जमिनीचा कब्जा घेतलेला नाही. प्रकल्पग्रस्त व माजी सैनिकांना दिलेल्या जमिनी विकता येत नाहीत, पण विक्रीचा प्रकार सुरू आहे ॲट्रॉसिटीची भीती दाखवून शेतकऱ्यांना हाकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबले नाही तर डोंगरावर सहकुटुंब आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी शेतकरी कृष्णात साळुंखे, तानाजी मगदूम, शिवाजी पाटील, ज्योतिराम पाटील, रमेश देसाई, बदाम साळुंखे, भूषण माळी, शशिकांत देसाई उपस्थित होते.

फोटो

: बामणी, ता. करवीर येथे शेतकऱ्यांची बैठक झाली.