शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काय आदर्श घ्यायचा?, ‘कागल’च्या जनतेची माफी मागा; मुश्रीफांच्या 'त्या' वक्तव्यावर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:11 IST

दोषी नव्हता तर पळून का गेला?

कोल्हापूर : ‘कागल’ राजर्षी शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वास पुढे आणून पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला. अशा कागलचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय वक्तव्य करीत आहेत. त्यांनी या थोर पुरुषांच्या विचारांचा अपमान केल्याचा आरोप ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केला.गडहिंग्लज येथील कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी ‘समरजीत घाटगे यांच्याबद्दल ‘भिकारी’ हा शब्द वापरला होता. यावर, घाटगे म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पुरोगामी कोल्हापुरातील जनतेने काय आदर्श घ्यायचा? शाहूंच्या कागलची ही बदनामी नव्हे का? यापूर्वी दिवंगत विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक, श्रीपतराव शिंदे, बाबासाहेब कुपेकर, आप्पासाहेब नलवडे यांच्यामध्ये टोकाचे मतभेद झाले. पण त्यांनी कधी अशी पातळी सोडली नाही. वारंवार शाहू महाराजांच्या कागलचा अपमान ते करत असून याच राजघराण्याने त्यांना राजकारणात आणले हे ते विसरले का?उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बदल्यांच्या दलालीचा आरोप हसन मुश्रीफ करत आहेत. पण, उपमुख्यमंत्री फडणवीस ज्यावेळी कोल्हापुरात येतील, त्यावेळी त्यांना जरूर विचारू. निवडणूक अजून जाहीर झालेली नसतानाही मुश्रीफ यांची ही अवस्था झाली आहे. ही निवडणूक हसन मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्यात राहिली नाही तर मुश्रीफ विरुद्ध ‘कागल’ची स्वाभिमानी जनता, अशी लढत होणार असल्याने ही निवडणूक हातून सुटल्याचा अंदाज त्यांना आला आहे.

दोषी नव्हता तर पळून का गेला?सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी शेतकऱ्यांकडून गोळा केलेले ४० कोटी हसन मुश्रीफ यांनी खाल्ल्याचा आरोप आपण केला होता. त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, तुरुंगवास इतर गोष्टी पुढच्या होत्या, मात्र त्या आधीच ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून गेले. दोषी नव्हता, तर ‘ईडी’चे पथक आल्यानंतर पाठीमागच्या दाराने पळून का गेला? असा सवाल समरजीत घाटगे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफ