शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

निर्यात कोट्यामुळे कच्च्या साखरेचे करायचे काय?, कोटा वाढवण्याची साखर महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 5:57 PM

५३ टक्के कच्ची साखर निर्यात परवान्याविना देशातच पडून राहणार

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : साखरेची निर्यात मर्यादा १०० लाख टन केल्यामुळे देशात कच्ची साखर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहून साखर उद्योगाचे विशेषतः सहकारी कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.सणासुदीच्या काळात देशात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून चालू हंगामात १०० लाख टनच साखर निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यासाठी एक जूनपासून साखर निर्यात परवाना (एक्स्पोर्ट रीलिज ऑर्डर) घेणे कारखाने आणि निर्यातदारांना सक्तीचे केले आहे. यानुसार पहिल्या आठवड्यातच केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने कच्ची साखर निर्यातीच्या दिलेल्या परवान्यांमधील केवळ ४७ टक्के परवाने सहकारी साखर कारखान्यांना दिले आहेत. यामुळे ५३ टक्के कच्ची साखर निर्यात परवान्याविना देशातच पडून राहणार आहे. परवाने मंजुरीत पक्षपाताचा आरोप राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने केला आहे.देशात २५८ सहकारी साखर कारखाने आहेत. गेल्या तीन हंगामात २२२ लाख टन साखरेची निर्यात केली आहे. या निर्यातीतून ६० हजार ८०० कोटींचा महसूल मिळाला आहे. आर्थिक अडचणीतून साखर उद्योग बाहेर पडण्यास यामुळे मदत झाली. निर्यात साखरेतील ४१ टक्के वाटा सहकारी साखर कारखान्यांचा आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील कारखान्यांची यामध्ये आघाडी आहे.

साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी म्हणून लाखो टन कच्ची साखर तयार करून ठेवली आहे. या साखरेला देशात मागणी नाही. शिवाय ती जास्त दिवस साठवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना पुरेसे निर्यात परवाने द्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे.

शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्रमाजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतंत्र पत्र लिहून, साखर कारखानदारीसमोरील या संकटाकडे लक्ष वेधले आहे आणि निर्यात कोटा १०० लाख टनापेक्षा वाढवून द्यावा, अशी मागणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी