शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

युरिया विरगळला कोठे? : कृषी विभाग म्हणते खते मुबलक ; जिल्ह्यात युरियाची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 12:08 PM

कृषी विभागाचे अधिकारी मात्र जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. मग युरियाची टंचाई का आहे? हा खरा प्रश्न आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात खतांची उपलब्धता मुबलक असल्याचे कृषी विभाग सांगत असले तरी शेतकऱ्यांना मात्र युरियाच्या पोत्यासाठी रानोरान फिरावे लागत आहे. उसाची भरणी आली आहे, आणि युरिया नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असताना कृषी विभाग कोणत्या आधारे खते भरपूर आहे म्हणून सांगते? मग युरिया नेमका विरगळला कोठे? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

सध्या उसाच्या लागणी व खोडव्यांच्या भरणीचे काम सुरू आहे. त्यासाठी युरियासह इतर खतांची शेतकऱ्यांना गरज आहे. युरियाने पिकांची वाढ जोमाने होतेच त्याचबरोबर पिकाला लवकर काळोखी येते. त्यात इतर खतांच्या तुलनेत परवडणारे असल्याने शेतकरी युरियाचा वापर करतात. मात्र गेली पंधरा दिवस जिल्ह्यात युरियाच नाही. कृषी विभागाचे अधिकारी मात्र जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. मग युरियाची टंचाई का आहे? हा खरा प्रश्न आहे.

याबाबत, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. सहकारी संस्थांपेक्षा खासगी विक्रेत्यांना खतांचा पुरवठा अधिक केला जातो, त्याचा परिणामही वितरणावर होत असल्याचा आरोपही केला. यावर जिल्हाधिकाºयांनी तातडीने संबंधित यंत्रणेकडे चौकशी करून युरियाचा पुरवठा करण्याचे आदेश दिले.

काळ्या बाजारात युरिया ३५० रुपयेआताच्या घडीला शेतक-यांच्या आवाक्यात असणारे खत युरिया आहे. त्याची कृत्रिम टंचाई दाखवून काळ्या बाजारात २६७ रुपयांचा युरिया ३५० रुपयांनी विक्री सुरू असल्याचा आरोप विक्रांत पाटील-किणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर केला. 

कोल्हापूरला २६ टन युरिया मिळणारजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संबंधित यंत्रणेकडे विचारणा केली असता, येत्या दोन दिवसांत कोल्हापूरसाठी २६ टन युरिया उपलब्ध केला जाईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी