शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

Lok Sabha Election 2019 कष्टकरी जनतेचा आवाज आहे कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:45 AM

वसंत भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रात सतराव्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत दोन आघाड्यांमध्येच आहे. एके काळी ...

वसंत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रात सतराव्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत दोन आघाड्यांमध्येच आहे. एके काळी अनेक मतदारसंघांत समाजवादी, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, तसेच जनता दल यांची लढत लक्षवेधी असायची. या पक्षांचे नेते शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे म्हणून तळपत असायचे. प्रथमच महाराष्ट्राच्या राजकारणातून समाजवादी आणि डावे पक्ष निवडणुकीच्या लढाईत कोठेही आघाडीवर नाहीत, असे स्पष्ट दिसते आहे.महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यातच प्रमुख लढत आहे. तिसरी शक्ती नाहीच. अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित विकास आघाडीने या चारही पक्षांच्या दोन्ही गटाविरुद्ध तिसरी शक्ती उभारण्याचा प्रयत्न केला आहे. या आघाडीची पहिलीच निवडणूक आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेने लोकसभा न लढविता भाजप-शिवसेना युती विरुद्ध प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष, कामगार आघाडी शेड्युल कास्ट फेडरेशन आदी पक्षांतर्फे अनेक दिग्गज उमेदवारांनी महाराष्ट्रातून निवडणुका लढविल्या आहेत, तसेच त्या जिंकून लोकसभेत राष्ट्रीय नेत्यांच्या माळेत जाऊन बसले आहेत.डाव्या आघाडीच्या किंवा समाजवादी पक्षांच्या नेत्यांची पार्श्वभूमी ही शेतकरी, कामगार तसेच कष्टकरी समाजाच्या हक्कासाठी नेहमी असायची. श्रीपाद अृमत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत, मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी मुंबईत कामगार चळवळीच्या माध्यमातून राजकारण करीत लोकसभेत पाऊल टाकले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सातारा आणि बीडमधून लोकसभेवर प्रतिनिधित्व केले होते. ना. ग. गोरे आणि एस. एम. जोशी या ज्येष्ठ समाजवादी मंडळींनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले होते. सध्याच्या पालघर आणि पूर्वीचा डहाणू मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दबदबा होता. लहानू कोम यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले.रायगड लोकसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला होता. गेल्या पंधरा निवडणुकांमध्ये आघाडीवरचा पक्ष म्हणून शेकापकडे पाहिले जात होते. दि. बा. पाटील यांच्यासह अनेकांनी तेथून प्रतिनिधित्व केले. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या विरोधातील निवडणुका गाजल्या आहेत. कोकणात पूर्वीचा राजापूर मतदारसंघ हा समाजवाद्यांचा बालेकिल्लाच होता. बॅ. नाथ पै आणि मधू दंडवते यांनी सलग दहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. मराठवाड्यातही शेकापचा परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, आदी मतदारसंघांत दबदबा होता. विदर्भात फॉरवर्ड ब्लॉकतर्फे जांबूवंतराव धोटे नागपूरमधून एकदा निवडून आले होते. वर्ध्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घृंगारे यांनी अनेक वेळा लढत दिली. एकदा त्यांनी वसंत साठे यांचा पराभवही केला होता.या निवडणुकीत माकपतर्फे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून आमदार के. सी. पडवी निवडणूक लढवित आहेत. हा अपवाद वगळता एकाही मतदारसंघातून समाजवादी किंवा डाव्या चळवळीतील उमेदवार नाहीत.वंचित आघाडी व शेट्टीयुती आणि आघाडी वगळता अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित विकास आघाडीत काही उमेदवार विविध चळवळीशी संबंधित आहेत. स्वत: आंबेडकर अकोला आणि सोलापुरातून निवडणूक लढवित आहेत.याउलट रिपब्लिकन पक्षांच्या एकाही गटाला युती किंवा आघाडीने उमेदवारी दिलेली नाही. शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले नेतृत्व राजू शेट्टी यांचा एकमेव अपवाद आहे, अन्यथा कोणत्याही चळवळी किंवा संघटनेचे प्रतिनिधी शर्यतीत नाहीत.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, क्रांतिसिंह नाना पाटील, आपल्या अभ्यासू संसदीय कार्याने गाजलेले प्रजा समाजवादी पक्षाचे बॅ. नाथ पै, शेतकरी कामगार पक्षाचे दि. बा. पाटील, केशवराव धोंडगे, समाजवादी नेते एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मृणाल गोरे, प्रमिलाताई दंडवते, भाई उद्धवराव पाटील, प्रा. मधू दंडवते, बापू काळदाते, रामचंद्र श्रृंगारे, श्यामराव परुळेकर, लहानू कोम, आनंदराव चव्हाण, डॉ. दत्ता सामंत, अहिल्याबाई रांगणेकर, भाऊराव गायकवाड आदी दिग्गज महाराष्ट्रातून निवडून येत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक